शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तालुक्यात २७ हेक्टरमध्ये रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:31 IST

ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो.

ठळक मुद्देपर्जन्य ४९ टक्केच : पावसाचा खंड, रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो. जमिनीला भेगा अन् डोक्याचा ताण वाढत जाऊन दिवस उजाडतो तो लख्ख प्रकाशाने. लावल्या रोपाला फुटवे आले. पण संथ वाढ, दुसरीकडे पावसाअभावी जूनमध्ये घातलेली भातरोपे तशीच पडून आहेत. अशी भयाण वास्तव परिस्थिती यावर्षी शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एकूणच मोहाडी तालुका खरीप पिकाच्या दुष्काळ छायेत दिसून येत आहे.जुलै व आॅगस्ट ही दोन महिने खूप पाऊस देणारी महिने समजली जातात. या दोन महिण्याच्या पावसावर भात पिकाचे भविष्य अवलंबून असते. जून महिन्याचा अगदी शेवटी पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात १९५.८ मिमी. पावसाची सरासरी अपेक्षीत होती. पण ७५.२ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस कान्हळगाव महसूल मंडळात २६.४ मि.मी. पडला. वरठी मंडळात १५१.२ मि.मी. तर मोहाडी, वरठी, कांद्री, आंधळगाव महसूल मंडळात ५० मिमीच्या वर पाऊस झाला. जुलै महिन्यात २९९.१ मिमी पाऊसाची सरासरी हवी होती. पण, ७४.४ मिमी एवढाच पाऊस झाला. तसेच आॅगस्ट महिन्यात ३९१ मि.मी. सरासरी हवा होता.१६ आॅगस्टपर्यंत केवळ २६.२ मिमी टक्केवारी पावसाने हजेरी लावली. आजपर्यंत पावसाची टक्केवादी ४९.२ मिमी एवढीच आहे. जून महिन्याच्या पावसाने भात नर्सरीची पेरणी दुसºया, तिसºया आठवडयात झाली. त्यानंतर ५ ते १३ जुलै या दरम्यान आठ दिवसाची पावसाने खंड पाडला. रोपांची वाढ खुंटली. १४ ते २० जुलैमध्ये पाऊस झाला. या पावसाने एकाच वेळी शेतकºयांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर पाऊस पडेल अशी आशा होती. कशी तरी शेतकºयांनी ओढून ताणून भात पिकाची लागवड केली. पावसाअभावी मोहाडी, वरठी या मंडळातील रोवणी १ आॅगस्टपासून थांबली आहेत.कान्हळगाव, आंधळगाव, कांद्री, करडी या महसुल मंडळातील रोवणी २९ जुलैपासून खोळंबली आहेत. त्यामुळे आतापर्यंत २६.९७ क्षेत्रातच रोवणी होवु शकली. २९ हजार ४६४ हेक्टर भात पिकाची लागवड होते. पण, फक्त ७ हजार ९३० हेक्टर भागात रोवणी पूर्ण झाली आहे. जून महिन्यापासून भाताची रोपे (पºहे) अजूनही पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. पावसाअभावी रोवणीसाठीची पºहे तशीच उभी आहे. करपले आहेत. भात पिकाची कोरडी जमीन पºहे लावणीसाठी आसूरलेली आहे. पावसाच्या अभावाने कोरड्या जागी पºह्याची रोपण होवू शकली नाही. काही भाताच्या शेतीत गवत उगविले आहे. भाताच्या जागी गवताने जागा घेतली आहे. आॅगस्ट महिन्याचा तपशिलावर दृष्टी घातली तर केवळ चारच दिवस पाऊस पडला. १ ते ४ आॅगस्ट या चार दिवशी पाऊसाचा पत्ता नाही.जो काही पाऊस पडला त्याची १८ आॅगस्टपर्यंतची पावसाच्या पर्जन्यमानाची सरासरी १७.२३ इतकी आहे. १ जुलै ते १६ आॅगस्ट सरासरी ८१३.०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र आतापर्यंत सरासरी गाठलीच नाही. कवेळ ४००.५ मिमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ४९.२ आहे. सात तालुक्याूध्ये पाऊस बरसण्यात मोहाडी तालुक्याचा सहावा क्रमांक लागतो. सर्वात जास्त पाऊस १ जून ते १६ आॅगस्टपर्यंत पवनी येथे ७२.२ टक्के, लाखांदूर ६५ टक्के, लाखनी ६२ टक्के , भंडारा ६०.२ टक्के, मोहाडी ४९.२ टक्के तुमसर येथे ४१.६२ टक्के इतका पडला. पावसाचा खरा फटका तुमसर, मोहाडी यांना बसला आहे. या दोन्ही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.गायमुख नदी, सुरनदीच प्रवाह थांबला, धरणात पाणी नाही, तलाव, बोळ्या रिकाम्या आहेत. सिंचन विहिरी खोल गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे पण, वीज साथ देत नाही. सिंचनासाठी वीज हवी असणाºया ४६५ शेतकरी वर्षभरापासून शेतपंपाच्या वीज जोडणीची प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे कर्जमाफीचा चॉकलेट दाखविला गेला. पण, एक दमडीही पदरात पडली नाही. केवळ घोषणाच सुरु आहेत. सातबारा कोरा होणार म्हणणारे नेते शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.सद्या स्थितीत पावसाअभावी ७३.०३ हेक्टर रोवणीचे क्षेत्र पडीत आहे. २६.९७ हेक्टर मधील भातपिकांना पाण्याचा ताण पडलेला आहे. जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पावसाचा खंड व पाण्याचा ताण यामुळे भात पिकांची वाढ समाधानकारक नाही. भाताच्या पिकाचे फुटवे निघण्याच्या स्थितीत आहेत.२० ते २५ टक्के भात पिकाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील जानकारांचे मत आहे. भात पिकाची क्षेत्र लागवड कमी, पावसाचा खंड, उत्पन्नात घटीची शक्यता यासोबतच एका नुकसानीची भर पडत आहे. ती रोगाच्या प्रादुर्भावाची भातावर आतपासून करपा व कडाकरपा या रोगाने हल्ला केला आहे. एकूणच चहुबाजूने शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात सापडला गेला आहे.शासन अन् निसर्ग दोघेही मेहरबान नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गोधंळाची शेतकºयांपूढे परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाव की मराव ही स्थिती निर्माण झाल्याने ऐन उत्सवात शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसायला लागले आहे.शेतीसाठी नव्या हंगामासाठी काढलेले नवीन कर्ज शेतकºयांच्या डोक्यावर आहे. ही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जगू ही देत नाही मरुही देत नाही. शासन मात्र शेतकºयांच्या हातावर तुरीच देत आहे.-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव/देवी