शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

५४१ ग्रामपंचायतींची वसुली ठप्प

By admin | Updated: December 17, 2015 00:47 IST

ग्रामपंचायतीची कर आकारणी नव्याने ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाने घरपट्टी वसुलीला स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींची कर वसुली थांबली आहे.

शासनाचा निर्णय नाही : विकास कामांना खीळ, ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडीभंडारा : ग्रामपंचायतीची कर आकारणी नव्याने ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाने घरपट्टी वसुलीला स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींची कर वसुली थांबली आहे. न्यायालयाने एप्रिलमध्ये हा निर्णय देऊन आठ महिने उलटले तरीही राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बंद झाला आहे. मूलभूत सुविधा आणि विकासकामे थांबली आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत.ग्रामपंचायतींकडून क्षेत्रफळावर आधारित घरपट्टी वसुली केली जाते. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा हवाला देत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियमातील नियम दोन व चार आणि पाच (अ) रद्दबातल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कर आकारणीत समानता व सुसूत्रता ठेवण्यासाठी शासनाने अभ्यास गट स्थापन केला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामावर दहा पटीने जादा कर आकारणी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याविरोधात ग्रामस्थांनी अनेक हरकती दाखल केल्या. एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने नवीन निर्णयानुसार घरपट्टी वसुलीवर बंदी घातली. त्याला ८ महिने होऊनही राज्य शासनाच्या अभ्यासगटाने अद्यापही ठोस करप्रणाली तयार केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली आहे. (नगर प्रतिनिधी)