शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्ह्याला पावसाने झोडपले; शेतपिकाचे नुकसान, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:49 IST

सरासरी ४२ मिमी पाऊस : ऑरेंज अलर्ट

भंडारा : जिल्ह्यात गत ३६ तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात सरासरी ४२ मिलिमीटर पाऊस बरसला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लाखनी व साकोली तालुक्यात करण्यात आली.

गत २४ तासांत बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ४०.४ मिमी, मोहाडी ३०, तुमसर २४.४, साकोली ५५, लाखांदूर ४१.३ तर लाखनी तालुक्यात ५१.१ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असल्याने रोवणीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्यासह सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस बरसत आहे.

मध्य प्रदेशातही सातत्याने पाऊस पडत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात संजय सरोवरासह पुजारीटोला व बावनथडीचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे भंडारा, वैनगंगा, कारधा नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. सध्या कारधा, वैनगंगा नदीची पातळी २४३.३४ मीटर इतकी आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीतून कुणीही प्रवास करू नये अशी सूचनाही निर्गमित करण्यात आली आहे.

रोवणी कामाला गती

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसल्याने रोवणीच्या कामाला जोमाने प्रारंभ झाला आहे. पऱ्हे काढण्याचे काम सुरू असून चिखलणी यंत्राच्या साहाय्याने जोमात सुरू आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पाणी बाध्यांमध्ये जमा झाल्याने पऱ्हे व रोवणी सडण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे धानपिकांचे नुकसान

मागील दिवसात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त सोडल्याने शेतातील धानपीक पाण्याखाली आले आहे. शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट कोसळले असताना नुकसान भरपाई देण्याची मागणी नवेदनातून करण्यात आली आहे. इंदिरा सागर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून परिसरातील शेतीला पाणी व्हावे म्हणून वितरिका तयार करण्यात आल्या.

सप्ताहात कालव्यातून गरजेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने बामणी-रुयाड- सिंदपुरी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील उभ्या पिकात पाणी शिरल्याने धानाची पन्हे पाण्याखाली येऊन सडली आहेत. जवळपास २ ते ३ फूट पाणी साचल्याने आवत्या धानदेखील पूर्णपणे पाण्यात दबून नुकसानीचे करण ठरले आहे. पंचायत समिती सदस्य बादल ठवरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक मदत द्यावी तसेच डाव्या कालव्यातून येणाऱ्या उपकालव्याची लांबी एक मीटरने वाढवून नदी पात्रापर्यंत न्यावी अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सखल भागात शिरले पाणी

भंडारा शहरातही मुसळधार पाऊस बरसला. रात्रीपासुन सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत कायम होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे भंडारा शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. वैशाली नगर, रुक्मीणी नगर, शीवनगरी या भागातील बहुतांश घरामध्ये व व्यापारी प्रतिष्ठानात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना घर सोडुन बाहेर यावे लागले. दुकानातील साहित्यही मोठ्या प्रमाणात ओले झाल्याने नुकसान झाले. खात रोड मार्गावरील आनंद मंगल कार्यालयात तीन ते चार फुट पाणी शिरले. नालीवर अतिक्रमण केल्याने उद्भवलेल्या या समस्येने नगरवासी त्रस्त झाले आहेत. अशी स्थिती भंडारा शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातही झाली आहे. रस्ता उंच व नाली खाली झाल्याने अक्षरश: पावसाचे पाणी घरात शिरले, त्यामुळे विषारी श्वापदांचाही धोका बळावला आहे. बांधकाम करताना अंदाज का घेण्यात आला नाही. अशी ओरड आहे.

वैनगंगा वाहतेय इशारा पातळीवर

मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस बरसल्याने संजय सरोवराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी ३६ तासात वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. सद्यस्थितीत वैनगंगा इशारा पातळीवर वाहत असुन त्याची पातळी २४३.३४ मीटर इतकी आहे. शहराला पुराचा धोका होऊ नये म्हणुन गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. पुढील दिवसही पावसाचे असल्याने नदीतून प्रवास करणे टाळावे असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसfloodपूरAmravatiअमरावती