शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

मास्क न घालणाऱ्या ६२० नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

ठळक मुद्दे९५ हजारांचा दंड वसूल : मंगल कार्यालये, हॉटेल्स, बार यांचीही तपासणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे कोरुना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येते. हाच दृष्टीकोन समोर ठेवून स्थानिक प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या शिवाय मंगल कार्यालय लॉन हॉटेल बाळ व वाईन शॉप व अन्य आस्थापनांमध्येही तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचे उद्दिष्ट समोर ठेवून भंडारा शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. भंडारा शहरातील मंगल कार्यालये, लॉन, बार, रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक करण्यात कारवाई करण्यात आली.यात १८ दुकानांसह मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. याशिवाय चार बार व रेस्टॉरंटची ही तपासणी करून या सर्वांकडून ते ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९५ हजार ५५० रुपयांची दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्यासह भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरपालिकेचे कर्मचारी प्रशांत गणवीर, मिथुन मेश्राम, संग्राम कटकवार, दादी मिश्रा, राहुल देशमुख यासह अन्य कर्मचारी सहभागी आहेत.

नागरिकांनो सावधान जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिक नियमांना तिलांजली देत आहेत. यामुळेच प्रशासनाला कडक कारवाई करण्यावरही जोर द्यावा लागत आहे. परिणामी नागरिकांनो सावधान. नियम तुमच्या हितासाठीच आहेत असे बोलण्याची नामुष्कीही ओढवली आहे. आता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या