शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जनतेची फसवणूक करणारे सरकार

By admin | Updated: February 11, 2015 00:45 IST

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या ...

लाखांदूर : मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता सर्व सामान्य जनतेच्या विरोधी निर्णय घेवून फक्त उद्योगपतीच्या स्वार्थ साधणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. लाखांदूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.तालुका काँग्रेस कमेटीच्या तवीने मिरा-कन्हैय्या सभागृहामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार सेवक वाघाये यांची उपस्थिती होती. मनोहर राऊत, ताराचंद मातेरे, देविदास चौधरी, सवॉस दुनेदार, जगन जंगम, ज्ञानेश्वर गणविर, अनिल खोब्रागडे, राजु कोचे, धनपाल ठलाल यांच्या सह ४० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तर भाजपाचे कार्यकर्ते लालदास देशमुख यांनीही काँग्रेस प्रवेश केला व लाखांदूर येथे युवा नेतृत्वात काम करणारी आर्यन्स ग्रुप संघटनेचे प्रमुख धम्मदीप रंगारी व सहकारी ७० युवकांनी काँग्रेस प्रवेश केला. माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले की, ज्या लोकांनी आश्वासन देवून मते मागितली. त्यांनी त्यांची पूर्तता न करता आपल्याकडे पाठ फिरविली आहे. लाखांदूर तालुका हा दुर्लक्षित व गरीब लोकांचा आहे. या ठिकाणी कुठलेही मोठे उद्योग नाहीत. विकास कामे नाहीत. चार पदरी रस्ते नाहीत. या भागाशी माझी नाळ जुळली आहे. तरी या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या तुमच्या निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे.सेवक वाघाये म्हणाले कार्यकर्त्यांनी एकत्र येवून भेदभाव विसरुन समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष बळकटी करणे गरजेचे आहे. संचालन तालुका प्रभारी मनोहर महावाडे तर आभार प्रदर्शन संतोष दोनाडकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)