शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जनतेची फसवणूक करणारे सरकार

By admin | Updated: February 11, 2015 00:45 IST

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या ...

लाखांदूर : मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता सर्व सामान्य जनतेच्या विरोधी निर्णय घेवून फक्त उद्योगपतीच्या स्वार्थ साधणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. लाखांदूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.तालुका काँग्रेस कमेटीच्या तवीने मिरा-कन्हैय्या सभागृहामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार सेवक वाघाये यांची उपस्थिती होती. मनोहर राऊत, ताराचंद मातेरे, देविदास चौधरी, सवॉस दुनेदार, जगन जंगम, ज्ञानेश्वर गणविर, अनिल खोब्रागडे, राजु कोचे, धनपाल ठलाल यांच्या सह ४० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तर भाजपाचे कार्यकर्ते लालदास देशमुख यांनीही काँग्रेस प्रवेश केला व लाखांदूर येथे युवा नेतृत्वात काम करणारी आर्यन्स ग्रुप संघटनेचे प्रमुख धम्मदीप रंगारी व सहकारी ७० युवकांनी काँग्रेस प्रवेश केला. माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले की, ज्या लोकांनी आश्वासन देवून मते मागितली. त्यांनी त्यांची पूर्तता न करता आपल्याकडे पाठ फिरविली आहे. लाखांदूर तालुका हा दुर्लक्षित व गरीब लोकांचा आहे. या ठिकाणी कुठलेही मोठे उद्योग नाहीत. विकास कामे नाहीत. चार पदरी रस्ते नाहीत. या भागाशी माझी नाळ जुळली आहे. तरी या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या तुमच्या निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे.सेवक वाघाये म्हणाले कार्यकर्त्यांनी एकत्र येवून भेदभाव विसरुन समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष बळकटी करणे गरजेचे आहे. संचालन तालुका प्रभारी मनोहर महावाडे तर आभार प्रदर्शन संतोष दोनाडकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)