शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दर शनिवार- रविवारी जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय बैठकीत निर्णय : कोरोना साखळी तोडण्यासाठी केली जाणार कडक उपाययोजना, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात यायचे नाव घेत नसल्याने आता दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याचा निर्णय सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय सभेत घेण्यात आला. या जनता कर्फ्यूची सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. लोकांच्या मनात कोरोना आजाराविषयी भीती असल्यामुळे उशिरा तपासणीसाठी येतात. ही बाब गंभीर असून लक्षण आढळताच तपासणी करण्याबाबत नागरिकात जनजागृती करावी, असे सर्वांचे मत होते.
जनता कर्फ्यू हा कडक आणि जिल्हाभर लागू करण्यात यावा, असे मत सर्वांनी मांडले. या काळात वैद्यकीय सेवा सुविधा वगळता सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. यात प्रामुख्याने पेट्रोलपंप, दारु दुकान, ढाबा आदींचा बंदमध्ये समावेश असावा असा सुरही बैठकीत उमटला. परंतु आरोग्य सेवासुविधा कुठेही थांबणार नाही व बाधित होणार नाही याची काटेकार काळजी घेण्यावर सर्वांचे एकमत झाले.
भाजीपाला दुकानाची व्यवस्था विकेंद्रीत असावी असेही या बैठकीत ठरले. खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराबाबत शासकीय दराचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावे असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाला द्यावे. तुमसर येथे कोविड रुग्णालय उभारले असून लवकरच साकोली व पवनी येथे उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला. त्यामुळे आता दर शनिवार, रविवार कडक जनता कर्फ्यू आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना खासदार सुनील मेंढे म्हणाले, ही लढाई सर्वांची असून आपण सर्व एकत्रीतपणे लढा उभारण्याची गरज आहे. जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, हा सर्वपक्षीय निर्णय असून आता अशा परिस्थितीत दुसरा कोणताच पर्याय नाही. नागरिकांनी शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले सध्या तरी मास्क सुरक्षीत अंतर व वारंवार साबणाने स्वच्छ करणे हेच एकमेव कोरोनावरील औषध आहे. कुठलाही आजार अंगावर न काढता तात्काळ तपासणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देवून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची गरज आहे. मात्र अनेकदा नागरिक सर्व नियम पायदळी तुडवत रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते.

पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबर
कोरोना संक्रमानाची साखळी तोडण्यासाठी आता दर शनिवार, रविवारला जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे. याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध
जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध असून आणखी तीन हजार इजेक्शनची मागणी नोंदविली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन शासनाकडून प्राप्त होत आहे. गंभीर रुग्णालाच हे इंजेक्शन दिले जाते. कृपया इतर रुग्णांनी या इंजेक्शनची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.