शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

अभयारण्याचा जनजागृती पोस्टरवर उत्पादनाचे साधन दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

एकीकडे वनाला लागून असलेल्या गावकऱ्यांना वनाचा फायदा दाखवण्यात येत असला तरी या गावकऱ्यांना अभयारण्यामुळे कोणत्याही प्रकारचे फायदा होताना दिसत ...

एकीकडे वनाला लागून असलेल्या गावकऱ्यांना वनाचा फायदा दाखवण्यात येत असला तरी या गावकऱ्यांना अभयारण्यामुळे कोणत्याही प्रकारचे फायदा होताना दिसत नाही. अभयारण्याला लागून असलेल्या गावकऱ्यांनी अभयारण्य याविषयी नाराजी निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतल्या जात नाही. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्यामुळे शेतातून कोणत्या प्रकारचे उत्पादन होत नाही. तसेच वनविभागाकडून दिलेली नुकसान भरपाई अत्यल्प असून वेळेवर मिळत नाही. अभयारण्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांचा आर्थिक विकास होईल असे वाटत होते. मात्र तसे होताना दिसत नाही. कोका अभयारण्यात पर्यटनासाठी असलेले वाहन स्थानिक लोकांनी न घेता तेथे असलेले वन कर्मचाऱ्यांनी वाहन घेतलेले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचा फायदा न होता येथील वन कर्मचाऱ्यांचा फायदा होताना दिसत आहे. सदर अभयारण्यातील गाईड सोडून जात असून त्यांना तिथे काम करणे परवडेनासे झाले आहे. या अभयारण्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मोठा फौजफाटा असून शासनाचा पैसा त्यांच्यावरच अधिकचा खर्च होत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी अमाप पैसा खर्च करत असला तरी पाहिजे त्या प्रमाणात त्याचा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे सदर अभयारण्य बंद करून त्याचे रूपांतर उद्यानात करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. तसेच जर उद्यान निर्माण झाले तर कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही कमी होईल व वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबेल. तारांचा कंपाऊंड केल्यामुळे वन्यप्राणी जंगलातून बाहेर पडणार नाही. अभयारण्याला लागून असलेल्या गावांमध्ये वन समिती स्थापन करण्यात आले होते. आज या समित्यांच्या कार्यकाळ पाच वर्ष पूर्ण झाला आता नव्याने त्या समित्या स्थापन करण्याचा आहे. मात्र त्या समितीमध्ये राहण्यासाठी कोणीच तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. समितीअंतर्गत गावकऱ्यांसाठी अनेक विकासात्मक कामे करण्यात येणार होते. तसेच काही प्रमाणात ते करण्यात आलेले आहे. मात्र गावकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात याचा फायदा झाला नसल्याने त्या समित्या नावापुरत्याच राहिलेले आहेत.