शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

५६ कोटींच्या पुलाचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: December 17, 2015 00:45 IST

मोहाडी तालुक्याच्या दोन भागांना जोडणारा वैनगंगा नदीवरील मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाचा ५६ कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे.

युवराज गोमासे करडीमोहाडी तालुक्याच्या दोन भागांना जोडणारा वैनगंगा नदीवरील मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाचा ५६ कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित पुलाचे बांधकामासाठी संसदेच्या अधिवेशनात मंजूरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना आॅगस्ट २०१५ मध्ये पाठविलेल्या अंदाजपत्रकाला बजेटमध्ये मंजुरी मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुका दोन भागात विभाजीत झालेला आहे. पुर्वेकडील भागात करडी, पालोरा, मुंढरी परिसरातील २७ गावांचा सामवेश आहे. या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तुमसर शहराला वळसा घालून जावे लागते. वैनगंगा नदीवरील पुलामुळे मुंढरी ते रोहा हे अंतर २० कि़मी. ने कमी होणार असून फक्त अर्ध्या तासात नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी पोहचता येईल.अनेक वर्षांपासून मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाची मागणी होत आहे. उपविभागीय अभियंता श्रावण कुहीकर यांच्या कार्यकाळात सुद्धा पुलाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र २५ कोटी रूपयांच्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला बजेट मध्ये मंजुरी मिळू शकली नव्हती. प्रस्ताव रेंगाळत राहिला. राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांनी ५६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. यामध्ये पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे. ५५० मिटर लांबीच्या पुलाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असताना बजेटमध्ये मंजुरी मिळालेली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.आंधळगाव-मोहाडी मुंंढरी ते पालांदूर या मार्गाला अगोदरच राज्य मार्ग ३६१ म्हणून मंजूरी देण्यात आली. याच राज्य मार्गावर मुुंढरी ते रोहा दरम्यान पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पुलाच्या पोचमार्गासाठी खाजगी व शासकीय जागेच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाच्या मार्ग २०१५ च्या बजेटमध्ये ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.भूसंपादनासाठी मोजणीचे काम थंडबस्त्यातभूसंपादनासाठी सर्व्हेक्षण व कार्यवाहीचे काम सुरू आहे. पोच मार्गे व रस्त्याचे रूंदीकरणासाठी भूसंपादन राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला करावा लागणार असला तरी सर्व्हेक्षणापलीकडे विभागाचे काम झाल्याचे दिसत नाही. अजुनही भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजणीचे कार्य सुरू झालेले नाहीत. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधिताना मोबदला दिला जातो. मात्र विभागाकडून मोजणीसाठी विलंब होत आहे.बंधारा, पूल बांधकामाची मागणीकोका जंगल टेकड्या व वैनगंगा नदीच्या मध्यभागी करडी, पालोरा परिसर असला तरी नेहमी येथील शेतीला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. विहिरी खोदल्या तरी पाणी पाहिजे तसे लागत नाही. तलाव बोड्या गाळाने उथळ झाल्याने सिंचन क्षमता बेताची आहे. नागरिकांनी अनेकदा मुंढरी-रोहा दरम्यान पुलाबरोबर पाणी साठवण बंधारा बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींना केली.