शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

५६ कोटींच्या पुलाचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: December 17, 2015 00:45 IST

मोहाडी तालुक्याच्या दोन भागांना जोडणारा वैनगंगा नदीवरील मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाचा ५६ कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे.

युवराज गोमासे करडीमोहाडी तालुक्याच्या दोन भागांना जोडणारा वैनगंगा नदीवरील मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाचा ५६ कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित पुलाचे बांधकामासाठी संसदेच्या अधिवेशनात मंजूरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना आॅगस्ट २०१५ मध्ये पाठविलेल्या अंदाजपत्रकाला बजेटमध्ये मंजुरी मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुका दोन भागात विभाजीत झालेला आहे. पुर्वेकडील भागात करडी, पालोरा, मुंढरी परिसरातील २७ गावांचा सामवेश आहे. या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तुमसर शहराला वळसा घालून जावे लागते. वैनगंगा नदीवरील पुलामुळे मुंढरी ते रोहा हे अंतर २० कि़मी. ने कमी होणार असून फक्त अर्ध्या तासात नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी पोहचता येईल.अनेक वर्षांपासून मुंढरी ते रोहा दरम्यानच्या पुलाची मागणी होत आहे. उपविभागीय अभियंता श्रावण कुहीकर यांच्या कार्यकाळात सुद्धा पुलाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र २५ कोटी रूपयांच्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला बजेट मध्ये मंजुरी मिळू शकली नव्हती. प्रस्ताव रेंगाळत राहिला. राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांनी ५६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. यामध्ये पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे. ५५० मिटर लांबीच्या पुलाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असताना बजेटमध्ये मंजुरी मिळालेली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.आंधळगाव-मोहाडी मुंंढरी ते पालांदूर या मार्गाला अगोदरच राज्य मार्ग ३६१ म्हणून मंजूरी देण्यात आली. याच राज्य मार्गावर मुुंढरी ते रोहा दरम्यान पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पुलाच्या पोचमार्गासाठी खाजगी व शासकीय जागेच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाच्या मार्ग २०१५ च्या बजेटमध्ये ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.भूसंपादनासाठी मोजणीचे काम थंडबस्त्यातभूसंपादनासाठी सर्व्हेक्षण व कार्यवाहीचे काम सुरू आहे. पोच मार्गे व रस्त्याचे रूंदीकरणासाठी भूसंपादन राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला करावा लागणार असला तरी सर्व्हेक्षणापलीकडे विभागाचे काम झाल्याचे दिसत नाही. अजुनही भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजणीचे कार्य सुरू झालेले नाहीत. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधिताना मोबदला दिला जातो. मात्र विभागाकडून मोजणीसाठी विलंब होत आहे.बंधारा, पूल बांधकामाची मागणीकोका जंगल टेकड्या व वैनगंगा नदीच्या मध्यभागी करडी, पालोरा परिसर असला तरी नेहमी येथील शेतीला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. विहिरी खोदल्या तरी पाणी पाहिजे तसे लागत नाही. तलाव बोड्या गाळाने उथळ झाल्याने सिंचन क्षमता बेताची आहे. नागरिकांनी अनेकदा मुंढरी-रोहा दरम्यान पुलाबरोबर पाणी साठवण बंधारा बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींना केली.