शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

विकास कामांचे सादरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:56 IST

सन २०१८-१९ साठी सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाहय) अशा तीनही योजना मिळून २०३ कोटी नियतव्यय मंजूर आहे. जिल्हयासाठी जिल्हा नियोजनमध्ये शासनाने ४० कोटी रूपयांची वाढ दिली आहे. हा सर्व निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हयात होणाऱ्या विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत प्रत्येक विभागाने करावे, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विकास कामाचे छायाचित्र व जिओ टॅगिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : बंधारे दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सन २०१८-१९ साठी सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाहय) अशा तीनही योजना मिळून २०३ कोटी नियतव्यय मंजूर आहे. जिल्हयासाठी जिल्हा नियोजनमध्ये शासनाने ४० कोटी रूपयांची वाढ दिली आहे. हा सर्व निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हयात होणाऱ्या विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत प्रत्येक विभागाने करावे, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विकास कामाचे छायाचित्र व जिओ टॅगिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार मधुकर कुकडे, आमदार सर्वश्री चरण वाघमारे, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजनाच्या सर्व कामांचे प्रस्ताव २० आॅगस्ट पुर्वी सादर करण्याच्या सूचना देवून ही अजून पर्यंत अनेक विभागाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रस्ताव सादर करण्यास २० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यानंतर येणारे प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही. विलंब झाल्यास संबंधित अधिकाºयांच्या गोपनीय अहवालात तशा प्रकारची नोंद घेवून कार्यवाही करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. अखर्चित खचार्चा तपशिल कारणांसह सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.जिल्हयातील २ हजार २५२ दुरुस्तीस आलेल्या लघुसिंचन बंधाऱ्यांच्या पुर्नरुजीवनाचे काम प्राधान्याने करावे. त्यास लागणाºया निधीचे प्रस्ताव सादर करा. त्यासाठी लागणारा वाढीव निधी जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात येईल. तसेच ‘लोकल सेक्टरचे रिस्ट्रक्चर’ करा, असे पालकमंत्री म्हणाले. पावसाळयाचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचे कामास गती दयावी. जिल्हा नियोजन मार्फत रोजगारभिमुख विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेत जिल्हयातील ६७ हजार ८४९ सभासदांच्या खात्यात १८२ कोटी ८ लाख ४२ हजार रुपये जमा करण्यात आल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. खरीप पिक कर्ज वाटपाचे जिल्हयाला ५५० कोटी ६६ लाखांचे उद्दिष्टय होते. यापैकी सर्व बँकांनी ३१५ कोटी ५४ लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप केले असून उर्वरित कर्ज वाटप ३० सप्टेंबर पूर्वी करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. जिल्हा परिषदच्या ज्या शाळांना शासकीय इमारत उपलब्ध नाहीत. अशा शाळांची उपविभागीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन गावात अगर गावालगत जी शासकीय जागा असेल ती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कृषि विषयक अनेक योजनांचा निधी परत गेला आहे. त्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाºयांनी कारणासह अहवाल सादर करावा.पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत येणाºया दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात येईल. तसेच पशुंसाठी लागणाºया औषधांसाठी निधी देण्यात येणार आहे. यावेळी उर्जा, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास, लघू सिंचन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, महिला व बाल विकास, पाणी पुरवठा, कृषि, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागाचा आढावा घेण्यात आला.