शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 16:05 IST

सिंचन करताना अडचणी: महावितरण विरोधात शेतकऱ्यांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी देताना अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या भाजीपाल्याला भाव चांगला आहे. आगामी दिवसांमध्ये भाजीपाल्याचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, धारगाव क्षेत्रात तासनतास भारनियमन करण्यात येत आहे. सध्या भंडारा तालुक्यात ४२ डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. या तापमानात पिके सुकत आहे. मात्र, यावेळीच भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणने वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गावांमध्येही वीजपुरवठा खंडितगावांमध्ये सध्या विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दररोज खंडित वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कडक उन्हाळा चालू असून, विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना बऱ्याच वेळा रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज सतत खंडित होत असल्यामुळे वृद्ध व्यक्त्ती, लहान मुले यांना फार त्रास होत आहे. ते नीट झोपतही नाहीत. उन्हाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षअनेक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

धारगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पिके सुकत आहे. परिणामी वाढत्या भावाचा फायदा होत नसून, लागवडीचा खर्चही व्यर्थ जात आहे.- धनराज कायते, शेतकरी

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन