शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

वनस्पतींची लागवड व संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:15 IST

परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यापैकी फक्त २० टक्केच माहिती असून त्यावर संशोधन सुरू आहे. अद्यापही ८० टक्के संशोधन शिल्लक आहे. मानवी जीवनाला ३८० औषधी वनस्पतींची गरज आहे. ज्यावर अजुनही संशोधन करू शकलो नाही.

ठळक मुद्देअश्विनी दिक्षित यांचे प्रतिपादन : करंजेकर फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

आॅनलाईन लोकमतसाकोली : परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यापैकी फक्त २० टक्केच माहिती असून त्यावर संशोधन सुरू आहे. अद्यापही ८० टक्के संशोधन शिल्लक आहे. मानवी जीवनाला ३८० औषधी वनस्पतींची गरज आहे. ज्यावर अजुनही संशोधन करू शकलो नाही. औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गुरू घासीदास विद्यापीठ बिलासपूर (छत्तीसगड) येथील प्रोफेसर डॉ. अश्विनीकुमार दिक्षित यांनी केले.ते वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्था द्वारा संचालित बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी येथे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या सेमिनारचे उद्घाटन डॉ. अश्विनी कुमार दिक्षीत यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे एलएमसी सदस्य लोकानंद नवखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले, सेमिनारचे मुख्य आयोजन प्रा. डॉ. सलिम फारूखी सहआयोजक प्रा. टी.पी. निंबेकर उपस्थित होते.डॉ. दिक्षित म्हणाले, याआधी ग्रामीण भागात हकीम औषधी वनस्पती गोळा करून विविध आजारावर उपचार करीत आणि त्यातून रुग्ण बरा होत असे. कॅन्सरसारख्या आजारावर औषधी वनस्पती उपयुक्त ठरत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. छत्तीसगड सारख्या भागात आदीवासी जनता औषधी वनस्पतीमधूनच आजारावर उपचार करीत आहे. परिणामी अशा औषधींचा शोध घेणे आवश्यक ठरते. व्यवसाय विकासाचे तंत्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींची लागवड व त्यांचे संवर्धन हा एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनारचा विषय होता.नागपूर येथील डॉ राजेंद्र काळे, नागपूर विद्यापीठ अंतर्गत फार्मासटीकल सायन्स विभागाचे डॉ. प्रकाश इटनेकर, अशोक जोनवाल, डॉ. शिशुपाल बोदेले, प्राचार्य सचिन लोहे, कामठी महाविद्यालयाचे डॉ. राजेश लोहिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. औषधी वनस्पतींचा शोध, त्यावरील संशोधन, त्यातून निर्माण होणारे औषध व त्याची उपयुक्तता, औषधी वनस्पतींच्या लागवडीमधून तयार होणारा व्यवसाय, त्यातून मिळणारी मिळकत व सरतेशेवटी या क्षेत्राचे महत्व अशा अनेक विषयावर या चर्चासत्रात उहापोह करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे ‘सोव्हीनियर’ या शोध प्रबंध पुस्तकाचे विमोचन करण्यात आले तर ‘जी पॅट’ परिक्षेत यश मिळविणाऱ्या प्रणय कोरे आणि वनश्री तवाडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी वतीने आयोजित राष्ट्रीय सेमिनारमध्ये कमला नेहरू कॉलेज आॅफ फार्मसी नागपूर, मनोहरभाई पटेल कॉलेज आॅफ फार्मसी गोंदिया, गुरूनानक कॉलेज आॅफ फार्मसी नागपूर, किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी कामठी आणि बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी साकोली इत्यादी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रचंड संख्येत सहभाग नोंदविला.चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रम, कामठी फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. राजेश लोहिया यांच्या अध्यक्षतेत पार पडला. अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले, सेमिनारचे मुख्य आयोजक डॉ. सलिम फारूखी, सहआयोजक तुळसीदास निंबेकर हे होते. संचालन प्रा अनिल साव, प्रस्ताविक प्रा. डॉ. डी.सी. गौपाले, सेमिनार चर्चासत्राचे संचालन काजल लिल्हारे, प्रा. पूजा हेमणे, समारोपीय कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. टी.पी. निंबेकर यांनी केले. एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनार कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी प्रतिनिधीनी सहकार्य केले.