शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पवनी पालिकेला मिळाला हागणदारीमुक्त गावाचा पुरस्कार

By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST

राज्यात प्रथमच नागरी भागासाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पवनी शहराला हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झाल्याबद्दल...

पवनी : राज्यात प्रथमच नागरी भागासाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पवनी शहराला हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे पवनीच्या नगराध्यक्षा रजनी मोटघरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुंबई येथील टाटा सभागृह नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस् येथे सत्कार समारंभात नगराध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागात यापूर्वी ग्राम स्वच्छता अभियान प्रभाविपणे राबवून गाव खेडे हागणदारीमुक्त करण्यात आले. युती शासनाने स्वच्छ भारत अंतर्गत राज्यातील नागरी भागासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविला. त्याअंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय निर्माण करून संपूर्ण राज्य स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प शासनाने आखलेला आहे. पवनी नगरपालिकेने सहभाग नोंदवून पवनी शहर हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला. शौचालय नसलेले कुटुंब शोधून त्यांना बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक शौचालयाची रंगरंगोटी करून पाण्याची उपलब्धता करून दिली. गावातील घाणीचे ठिकाण शोधून गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौच्छास बसणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध घातला. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला. पालिकेचे कर्मचारी, शिक्षकवृंद यांनी गुड मॉर्निंग पथकात सक्रीय सहभाग घेतला. लोकांनी सहकार्य केल्यामुळे राज्यपातळीवर सन्मान मिळविण्याचा मान पालिकेला मिळालेला आहे. पवनी शहर सदैव स्वच्छ व सुंदर राहावे अशी नगरवासीयांची भावना आहे. पहिला वहिला पुरस्कार मिळाल्याने नागरिकांत आनंदमय वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)