सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात ...
आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मा ...
अनेक गावातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याला कारणीभूत तलाठी व मंडळ अधिकारी असून योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ...
रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही ...
पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून स ...
रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या क ...
जिल्ह्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता नि ...
कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्य ...
लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण् ...