शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:08 AM

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली.

ठळक मुद्देपावसाची दडी : एक लाख ६१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार हेक्टरवरच रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली आहे. एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३९५ हेक्टरवर रोवणी झाली आहे. एकुण क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी आटोपली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत.भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली. परंतु गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पाऊस कोसळत आहे. काही भागात तर पावसाचे दर्शनही झाले नाही. परिणामी रोवणी रखडली आहे. भंडारा तालुक्यात २१३०६ हेक्टर रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत केवळ १९५७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. मोहाडी तालुक्यातील २७०९६ हेक्टर पैकी ५७३० हेक्टर, तुमसर तालुक्यात २७ हजार ५६९ हेक्टरपैकी ५३२५ हेक्टर, पवनी १८ हजार ६९२ हेक्टर पैकी २९६९ हेक्टर, साकोली १८ हजार ५०१ हेक्टर पैकी ८७४० हेक्टर, लाखनी २२ हजार ६३१ हेक्टर पैकी ६७१२ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रापैकी ५७९८ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. नियोजित क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी झाली आहे.पावसाने दडी मारल्याने रोवणी रखडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३० मिमी असून आतापर्यंत ४४६.२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही अनेक भागात पावसाने दर्शनच दिले नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय रोवणी करणे शक्य नाही. ओलीताची सोय असलेले शेतकरी रोवणी करीत असले तरी त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. रोवणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सर्वसाधारण धानाची लागवड केली जाते. कमी कालावधीत निघणारा हा धान असून रोवणीस उशीर झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.जिल्ह्यात सरासरी ४४६ मिमी पावसाची नोंदभंडारा जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ४४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुका ५५९ मिमी, मोहाडी ४०७.६ मिमी, तुमसर ३०४.० मिमी, पवनी ४५०.७ मिमी, साकोली ५१२.८ मिमी, लाखांदूर ३३७.२ मिमी आणि लाखनी ५५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष पडणाºया पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९० टक्के असला तरी रोवणीयोग्य मात्र निश्चितच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणी रखडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस