शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धान उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:53 AM

ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

ठळक मुद्देढगाळ वातावरण : ओले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. दोन दिवसाच्या पावसाने ओले झालेले धान वाळविण्याचे प्रयत्न आता जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धानावर अवलंबून आहे. या वर्षी हंगामात एका पाण्याअभावी अनेकांचा धान हातचा गेला. बहुतांश शेतकºयांनी ओलीत करून धान पिकविला. घरी आलेला धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. परंतु तेथे बारदान्याअभावी खरेदी मंद असल्याने उघड्यावरच धान ठेवावा लागला. रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात शेतकºयांची हजारो पोती धान ओलेचिंब झाले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला आहे. आता ओला झालेला धान कुणी खरेदी करणार नाही म्हणून शेतकरी आधारभूत केंद्रावरून धान घरी नेण्याच्या तयारीत आहेत. आणण्यासाठी जेवढा खर्च लागला तेवढाच खर्च धान घरी नेण्यासाठी लागत आहे. हा धान उन्हात वाळवावा लागणार आहे. परंतु गत दहा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कधी निवडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी पोते फोडून धान घराच्या आवारात झाकून ठेवला आहे.ओला झालेला धान पाखर होण्याची भीती आहे. बेचव झालेल्या धानाला बाजारात किंमत येत नाही. तसेच भरडाईनंतर त्याच्या रंगातही बदल जाणवतो. तसेच हा धान अधिक दिवस साठवूनही ठेवता येत नाही. एकंदरीत सर्वच बाजूनी शेतकºयांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. धानासोबतच बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादूर्भाव वाढला आहे.अपुºया पावसाने धान उध्वस्त झाल्यावर शेतकºयांनी दुष्काळाची मागणी केली होती. परंतु शासनाने दुष्काळ घोषित केला नाही. भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश नव्हता. सुरुवातीला एका पाण्याने आणि आता अवकाळी पावसाने शेतकरी पूरता उध्वस्त झाला आहे. घेतलेले कर्ज कसे फेडावे याचीच चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना लागली आहे. पावसामुळे ओला झालेल्या धानाचे नुकसानभरपाई देण्याचीही मागणी पुढे येत आहे.आधारभूत केंद्रांवर बारदाण्याचा अभावआधारभूत केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी पणन महासंघाच्या वतीने बारदाना पुरविला जातो. या बारदाना पुरविण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रांवर बारदाना पुरविला जातो. परंतु धानाची मोठी आवक झाल्याने बारदाना अपुरा पडत आहे. काही ठिकाणी आलेला बारदाना अर्धा अधिक फाटका असल्याचे दिसून आले. अशा फाटक्या बारदान्यात धान भरावा कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच खरेदीची गती मंदावली. परिणामी शेतकºयांना आपला धान आधारभूत केंद्रात उघड्यावर ठेवावा लागला. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. बारदान्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी