शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना एक कोटीचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे,  ओटीपीच्या माध्यमातून बँकेतून पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यातूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाकाठी भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत एक कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ३५ प्रकरणे,  तर गत दहा महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे गोंदिया जिल्ह्यात  १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.  अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो.  आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की, ते मिळणे कठीण आहे.

अनोळखी ॲप घेऊ नकाn डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ॲप्लिकेशन्स आली आहेत. हेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक ‘सर्व टर्मस् आणि सर्व कंडिशन्स अप्लाय’ करतात. त्यामध्येच ‘ऑटो ओटीपी रीड’ यालासुद्धा परवानगी देऊन टाकतात. अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी, आता स्वतः जागरूक होऊन नागरिकांनीच ‘अनोळखी ॲप नको रे बाबा’ अशी बाब म्हणण्यास सुरुवात केली आहे. फसवणुकीचे गुन्हेही अशाच ॲपमधून डेटा चोरी करून घडत आहेत.

महिन्याकाठी तीन-चार गुन्हे

- भंडारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी २४ लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.  महिन्याकाठी तीन- चार गुन्हे घडतच असतात.  जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे; परंतु अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत. पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे केले जाते. 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी