शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

नेहमी सावध राहाणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:28 PM

अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात.

ठळक मुद्देसंजय देशमुख यांचे प्रतिपादन : वरठीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी: अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात. कायद्याने अधिकार व हक्क सुरक्षित राहू शकतात. कर्तव्याची जाणीव ठेवून वागलो तर अधिकराची पायमल्ली होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने अधिकार मागताना मानवी मूल्याचे जतन करण्यासाठी कर्तव्य पाळणे गरजेचे आहे. मानवी प्रवृत्तीतील राक्षस जागा झाला की सर्व घोळ निर्माण होतो. मानवी प्रवृत्तीतील राक्षस केव्हा जागा होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हणून सभोवताल घडणाºया घटनांपासून बचावासाठी अखंड सावधान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठीच्यावतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, आजूबाजूला घडणाºया अनेक अनुचित घटना या आपल्या परिचितांकडून केल्या जातात. लैगिक अत्याचारासारख्या घडणाºया सर्वाधिक घटना या परिचितांमार्फत झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. लैंगिक अत्याचारापासून सावधानता म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे नसून त्याबाबत सजग राहणे आहे. सुरक्षेकरिता नियमित सावध राहणे आहे.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश -१ आर पी पांडे, जिल्हा न्यायाधीश -२ एन. व्ही. जिवने, जिल्हा न्यायाधीश -३ एस. बी. भन्साली, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. के. साबळे, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) डी. एम. धालीवाल, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. बी. येर्लेकर, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. एच राठी, चौथे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. डी. मेंढे, नवनिर्माण संस्थेचे सचिव अ‍ॅड. कैलास भुरे, अध्यक्ष मिलिंद मदनकर उपस्थित होते.सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अनेक उदाहरण देऊन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीची माहिती दिली. जीवनात अनेक रहस्यमय घडामोडी घडतात, पण त्यावर मात करणे हे शेवटी आपल्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युगातील मांजर आडवी गेल्याच्या म्हणजे आपण आपल्या सभोवताल असणाºया सुविधांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास आयुष्यात अडथळे येतात असे सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक प्रमाणात करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा.आशिष बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा अविनाश नवखरे , प्रा रजनी भुरे, प्रा मधुकर गोमासे, संगीता वखालकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी आर. भुरे उपस्थित होते.