शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देगुरुप्रसाद पाखमोडे : जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोलीभाषेच्या विकासाने प्रमाणभाषा समृद्ध होत असते. मराठी भाषा ही अनेक बोलीभाषांची भाषिक कौशल्य असलेली समृद्ध भाषा होय. अलीकडच्या काळात इंग्रजीच्या अतिवापराने मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव जाणवत आहे. इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून अपरिहार्य असली तरी मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले.वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयश्री सातोकर, कवी प्रमोद अणेराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.मराठी भाषेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहचले आहे. अशावेळी मराठी भाषेला उतरती कळा लागली असे म्हणणे संयुक्तीक होणार नाही. मात्र जागतिक संगणकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या अतिवापराने तसेच मराठी बोलण्याच्या संकोचाने मराठीचा वापर कमी होताना दिसत आहे. दोन मराठी व्यक्ती आपसात इंग्रजी किंवा हिंदीतून संभाषण करतात, अशावेळी हा धोका अधिक संभवतो. भाषेच्या कक्षा विस्तारताना आपली भाषेची समज व ज्ञान वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे मत पाखमोडे यांनी व्यक्त केले.भाषेचा इतिहास व संस्कृती विशद करताना प्रमोद अणेराव यांनी अनेक संदर्भ दिले. बारा मैलावर बोली बदलत असली तरी भाषा ही कायम असते. भाषेचा गोडवा प्रत्येकांनी जोपासण्याची गरज मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मार्गदर्शन केले. संचालन संजय नारनवरे यांनी केले.संत साहित्याने मराठी समृद्धमराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा असून संत साहित्याने मराठीला समृद्ध करण्याचे काम पूर्वापार केले, असे प्रा.डॉ.जयश्री सातोकर यांनी सांगितले. मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा असून मराठीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले. संत साहित्यातून सुद्धा बोलीभाषेचा गोडवा आपणास पहावयास मिळतो. बोलीभाषा व व्यवहार्य भाषा वेगळ्या असल्या तरी त्याचा एकच उगम असतो. बोलीभाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे डॉ.सातोकर यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी