शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देगुरुप्रसाद पाखमोडे : जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोलीभाषेच्या विकासाने प्रमाणभाषा समृद्ध होत असते. मराठी भाषा ही अनेक बोलीभाषांची भाषिक कौशल्य असलेली समृद्ध भाषा होय. अलीकडच्या काळात इंग्रजीच्या अतिवापराने मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव जाणवत आहे. इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून अपरिहार्य असली तरी मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले.वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयश्री सातोकर, कवी प्रमोद अणेराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.मराठी भाषेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहचले आहे. अशावेळी मराठी भाषेला उतरती कळा लागली असे म्हणणे संयुक्तीक होणार नाही. मात्र जागतिक संगणकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या अतिवापराने तसेच मराठी बोलण्याच्या संकोचाने मराठीचा वापर कमी होताना दिसत आहे. दोन मराठी व्यक्ती आपसात इंग्रजी किंवा हिंदीतून संभाषण करतात, अशावेळी हा धोका अधिक संभवतो. भाषेच्या कक्षा विस्तारताना आपली भाषेची समज व ज्ञान वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे मत पाखमोडे यांनी व्यक्त केले.भाषेचा इतिहास व संस्कृती विशद करताना प्रमोद अणेराव यांनी अनेक संदर्भ दिले. बारा मैलावर बोली बदलत असली तरी भाषा ही कायम असते. भाषेचा गोडवा प्रत्येकांनी जोपासण्याची गरज मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मार्गदर्शन केले. संचालन संजय नारनवरे यांनी केले.संत साहित्याने मराठी समृद्धमराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा असून संत साहित्याने मराठीला समृद्ध करण्याचे काम पूर्वापार केले, असे प्रा.डॉ.जयश्री सातोकर यांनी सांगितले. मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा असून मराठीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले. संत साहित्यातून सुद्धा बोलीभाषेचा गोडवा आपणास पहावयास मिळतो. बोलीभाषा व व्यवहार्य भाषा वेगळ्या असल्या तरी त्याचा एकच उगम असतो. बोलीभाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे डॉ.सातोकर यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी