शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सैतान संचारला, डोक्यात लाकडी पाट घालून ‘त्याने’ पत्नीलाच संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:41 IST

भल्या पहाटे झाला थरार : जीवघेणा हल्ला करून पती झाला पसार

लाखनी (भंडारा) : सर्वजण साखरझोपेत असताना भल्या पहाटे ४ वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो एवढा विकोपाला गेला की पतीने लाकडी पाटच तिच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून पतीने घरातून पळ काढला. मात्र उपचारादरम्यान पत्नीचा नागपुरात मृत्यू झाला. ही घटना लाखनी तालुक्यातील सेलोटी या गावात घडली.

मृत पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे (४०) असून क्रूरकर्मा पतीचे नाव भारत (४५) असे आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून किरकोळ वाद आणि कुरबूर सुरू असायची. मंगळवारी (ता. २९) पहाटे ४ वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. या वादात ती स्वयंपाकघरात गेली. तिच्या पाठोपाठ जात त्याने घरातच पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला. यामुळे खोलवर जखम झाल्याने रक्तबंबाळ होऊन ती बेशुद्ध होऊन पडली. यानंतर भारतने पळ काढला.

दरम्यान, मुले झोपून उठली तेव्हा त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तिला लगेच उपचारासाठी लाखनी येथे नेले. परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर नागपुरात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या हत्येची तक्रार खुशी नामक १६ वर्षीय मुलीने लाखनी पोलिसात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळाला पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक देवीदास बागडे आदींनी भेट दिली. भारतच्या तपासासाठी पोलिसांनी शोध सुरू केला असून पोलिसांचे पथक रवाना केले आहेत.

सर्वांदेखत भारतने काढला पळ

या दांपत्याला दोन मुले आहेत. या चौघांव्यतिरिक्त कुटुंबात कुणीच नाही. रोज सकाळी लवकर ते सर्वजण पूजेसाठी उठत असत. घटनेच्या दिवशी मुले उठली असता आई रक्तबंबाळ होऊन पडलेली दिसली. यावेळी वडील भारतही घरीच होता. मुलींनी हे दृश्य पाहून आरडाओरड आणि रडारड केली. त्यामुळे शेजारच्या लोकांनी धाव घेतली. या दरम्यान सर्वांदेखत भारतने घरातून पळ काढला.

भारती करायची मंगल कार्यालयात काम

या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची आहे. भारत हा गवंडीकाम करायचा. तर, संसाराला मदत व्हावी म्हणून भारती लाखनीमधील एका मंगल कार्यालयात रोजीने कामाला जात असे. या घटनेचे कारण अद्यापही कळलेले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूbhandara-acभंडारा