शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जेवनाळा येथील मालगुजारी तलावाचे रूप पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे .

ठळक मुद्देमातीचे ढिगारे झाले दूर : जलसाठ्यात वाढ, शेतीला व जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गाव तलाव अर्थात मामा तलाव शेतकरी व गावकऱ्यांना मोठे वरदान ठरलेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या तलावातून कित्येक पशुपक्षी, जनावरे यांची तृष्णा शांत होत पर्यावरण समतोल राखण्यासाठी यांची मोठी मदत झालेली आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील जेवणाला येथील मामा तलाव विस्तीर्ण जागेत असून सूमारेअडीचशे ते तीनशे एकर खरीपात सिंचन होऊन शेतकऱ्यांना मदत होते. गावातील खाजगी विहिरीला सुद्धा या तलावातून पाझर माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या मोठी मदत शक्य आहे.जून २०१८ ला जल शिवार योजनेतून खोली करण्याचे काम हाती घेतले गेले. यातून तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे . जेवढा पाणी तलावात साचेल तेवढी मदत गरजूंना नक्कीच होईल. गाव तलाव गावच्या सौंदयार्चा व श्रीमंतीचा एक अंग असल्याने प्रत्येक गावकºयांनी मामा तलावाची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मामा तलावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मामा तलावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे हिट मध्ये सुद्धा आजही तलावात भरपूर पाणी असल्याने तलावाचे अस्तित्व महत्त्व आपोआपच समोर येते आहे.गाव तलावाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, सौंदर्यीकरण करीत तलावाचे जलशाठ्यात प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती वाढत असता त्याची निगा राखणे व देखभाल-दुरुस्ती वेळेत करणे अत्यावश्यक झाले आहे. पाणी हे जीवन असल्याने गावकऱ्यांनी मामा तलावांना गावाची संपत्ती समजत काळजी घेणे अगत्याचे आहे.जेवनाळा येथील मामा तलावाच्या पाळीवरील मातीचे ढिगारे दूर झाल्याने तलावात येणाºया पाण्याचा प्रवाह खुला होत तलावाची शान अबाधित राहायला मोठी मदत होईल. शासनासह प्रत्येक गावकºयांनी सुद्धा तलावाच्या अस्तित्वाची व नियोजनााची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुपाटबंधारे विभाग यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प