शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : राजकीय नेत्यांची गर्दी ओसरली, अधिकाऱ्यांनी टाकला डेरा

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत २२ विश्रामगृह व विश्रामभवन आहेत. यात भंडारा येथे असलेल्या विश्राम भवनात वातानुकुलीत सहा सुट आणि साधे चार सुट आहेत. तसेच लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे प्रत्येकी दोन सुट आहेत. निवडणुकीची घोषित होताच १० मार्चपासून आचारसंहिता लागू होते. राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने, सामान्य जणांसह विशेषांकडे असणारी शस्त्रेही जमा करावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी दंगा धोपा होईल अशी कृत्ये किंवा हरकतींवर प्रशासनाची करडी नजर असते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व परिसरात कुठलाही उमेदवार सभा किंवा कार्यक्रम घेऊ शकत नाही. संबंधित विश्रामगृहाचे सूट केवळ निवडणूक कार्यात सहभागी असणारे अधिकारी, सतर्कता समिती याशिवाय भरारी पथकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर भेट देणारे अधिकारीसुद्धा याच विश्रामगृहात निवडणुका संदर्भाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या कारणाने गजबजलेले विश्रामगृह परिसरात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्तेही येथे भटकत नाही. मान्यता नसल्यामुळे सभाच होत नाही तर जायचे कशाला? अशीही खुसफूस ऐकायला मिळत आहे.साकोली तालुक्यात लाखो रुपये खर्चून विश्रामगृहाची प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात आले. येथे दोन सुट उपलब्ध आहेत, मात्र अनेक वर्षापासून त्याठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृह शोभेची वास्तू ठरत आहे. साकोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागझिरा अभयारण्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवेगावबांध येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. मात्र येथे कर्मचारी नसल्याचे कारण समोर करुन पर्यटकांचा हिरमोड केला जात आहे.प्रवेशव्दारावर सूचना फलकभंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत एकुण २२ विश्रामगृह व विश्राम भवनाच्या प्रवेशव्दारावर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार सुचना फलक लावण्यात आले आहे. या फलकावर १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने जिल्ह्यातील सर्व विश्रामभवन, गृहाचे आरक्षण जिल्हाधिकाºयांच्या परवानगी शिवाय देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय सभा, बैठक घेण्यास प्रतिबंध असल्याचे नमूद आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक