शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : राजकीय नेत्यांची गर्दी ओसरली, अधिकाऱ्यांनी टाकला डेरा

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत २२ विश्रामगृह व विश्रामभवन आहेत. यात भंडारा येथे असलेल्या विश्राम भवनात वातानुकुलीत सहा सुट आणि साधे चार सुट आहेत. तसेच लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे प्रत्येकी दोन सुट आहेत. निवडणुकीची घोषित होताच १० मार्चपासून आचारसंहिता लागू होते. राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने, सामान्य जणांसह विशेषांकडे असणारी शस्त्रेही जमा करावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी दंगा धोपा होईल अशी कृत्ये किंवा हरकतींवर प्रशासनाची करडी नजर असते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व परिसरात कुठलाही उमेदवार सभा किंवा कार्यक्रम घेऊ शकत नाही. संबंधित विश्रामगृहाचे सूट केवळ निवडणूक कार्यात सहभागी असणारे अधिकारी, सतर्कता समिती याशिवाय भरारी पथकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर भेट देणारे अधिकारीसुद्धा याच विश्रामगृहात निवडणुका संदर्भाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या कारणाने गजबजलेले विश्रामगृह परिसरात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्तेही येथे भटकत नाही. मान्यता नसल्यामुळे सभाच होत नाही तर जायचे कशाला? अशीही खुसफूस ऐकायला मिळत आहे.साकोली तालुक्यात लाखो रुपये खर्चून विश्रामगृहाची प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात आले. येथे दोन सुट उपलब्ध आहेत, मात्र अनेक वर्षापासून त्याठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृह शोभेची वास्तू ठरत आहे. साकोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागझिरा अभयारण्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवेगावबांध येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. मात्र येथे कर्मचारी नसल्याचे कारण समोर करुन पर्यटकांचा हिरमोड केला जात आहे.प्रवेशव्दारावर सूचना फलकभंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत एकुण २२ विश्रामगृह व विश्राम भवनाच्या प्रवेशव्दारावर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार सुचना फलक लावण्यात आले आहे. या फलकावर १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने जिल्ह्यातील सर्व विश्रामभवन, गृहाचे आरक्षण जिल्हाधिकाºयांच्या परवानगी शिवाय देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय सभा, बैठक घेण्यास प्रतिबंध असल्याचे नमूद आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक