शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : राजकीय नेत्यांची गर्दी ओसरली, अधिकाऱ्यांनी टाकला डेरा

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत २२ विश्रामगृह व विश्रामभवन आहेत. यात भंडारा येथे असलेल्या विश्राम भवनात वातानुकुलीत सहा सुट आणि साधे चार सुट आहेत. तसेच लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे प्रत्येकी दोन सुट आहेत. निवडणुकीची घोषित होताच १० मार्चपासून आचारसंहिता लागू होते. राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने, सामान्य जणांसह विशेषांकडे असणारी शस्त्रेही जमा करावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी दंगा धोपा होईल अशी कृत्ये किंवा हरकतींवर प्रशासनाची करडी नजर असते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व परिसरात कुठलाही उमेदवार सभा किंवा कार्यक्रम घेऊ शकत नाही. संबंधित विश्रामगृहाचे सूट केवळ निवडणूक कार्यात सहभागी असणारे अधिकारी, सतर्कता समिती याशिवाय भरारी पथकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर भेट देणारे अधिकारीसुद्धा याच विश्रामगृहात निवडणुका संदर्भाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या कारणाने गजबजलेले विश्रामगृह परिसरात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्तेही येथे भटकत नाही. मान्यता नसल्यामुळे सभाच होत नाही तर जायचे कशाला? अशीही खुसफूस ऐकायला मिळत आहे.साकोली तालुक्यात लाखो रुपये खर्चून विश्रामगृहाची प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात आले. येथे दोन सुट उपलब्ध आहेत, मात्र अनेक वर्षापासून त्याठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृह शोभेची वास्तू ठरत आहे. साकोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागझिरा अभयारण्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवेगावबांध येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. मात्र येथे कर्मचारी नसल्याचे कारण समोर करुन पर्यटकांचा हिरमोड केला जात आहे.प्रवेशव्दारावर सूचना फलकभंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत एकुण २२ विश्रामगृह व विश्राम भवनाच्या प्रवेशव्दारावर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार सुचना फलक लावण्यात आले आहे. या फलकावर १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने जिल्ह्यातील सर्व विश्रामभवन, गृहाचे आरक्षण जिल्हाधिकाºयांच्या परवानगी शिवाय देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय सभा, बैठक घेण्यास प्रतिबंध असल्याचे नमूद आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक