शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान भारत’ ठरु शकते कोरोनात संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोना उपचार समावेशाची गरज : जिल्ह्यात आयुष्यमानमध्ये एक लाख ३४ हजार कुटुंब ठरले आहेत पात्र

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी दोन वर्षापूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत १३५० आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आता महामारीच्या काळात या योजनेत कोरोना उपचाराचा समावेश केल्यास रुग्णांसाठी मोठी संजीवनी ठरु शकते.केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा दोन वर्षापूर्वी शुभारंभ झाला होता. देशातील दहा कोटी ४७ लाख कुटुंबाना लाभ देण्याची ही महत्वाकांक्षी योजना होय.या योजनेंतर्गत अनेक कुटुंबानी आतापर्यंत लाभ घेतला आहे. मात्र ही योजना कार्यान्वित झाली त्यावेळी कोरोना संसर्गाचा कोणताही प्रादूर्भाव नव्हता. खरे पाहता त्यावेळेस कोरोना आजारही कुणाला माहित नव्हता. आता कोरोना संसर्ग संपूर्ण देशभर पसरत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. या आजारावर शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातही उपचार केले जातात. खाजगी रुग्णालयात उपचार करताना मोठी रकम मोजावी लागते. ही रकम सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरची असते. अशा स्थितीत आयुष्यमान भारत योजनेत कोरोना आजाराचा समावेश केल्यास लाखो कुटुंबाना त्याचा फायदा मिळू शकतो.एकट्या भंडारा जिल्ह्यात एक लाख ३४ हजार ४४८ लाभार्थ्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यात शहरी १५ हजार ४९० आणि ग्रामीण एक लाख १८ हजार ९५८ लाभार्थ्यांचा समावेश होता. १३५० आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणाऱ्या या योजनेत आता कोरोनाचा समावेश केल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनेत देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय किंवा खाजगी रुग्णालयातून लाभ घेता येतो. रुग्णालयातमध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया राबविली जाते. योजनेचे ई-कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्राच्या माध्यमातून उपचार केले जातात. आता सर्वत्र कोरोना संसर्ग वाढत असताना या आजाराचा समावेश आयुष्यमान भारतमध्ये केल्यास अनेकांसाठी संजीवनी ठरु शकते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी आरोग्य यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी प्रयत्न करीत आहे.नागरिकांनी कोरोनाला घाबरु नये, जागरुक रहावेजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये, जागरुक राहून आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम असून कोरोना निर्मुलनासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या