शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

महामार्गावरील धोकादायक रस्त्याकडेला किमान माती तरी टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

भंडारा शहरातील आरटीओ ऑफिस ते मुजबीपर्यंतचा रस्ता अरुंद असून रस्त्याकडेला असलेल्या धोकादायक कडा तरी किमान भरा नाहीतर टोलवसुली बंद ...

भंडारा शहरातील आरटीओ ऑफिस ते मुजबीपर्यंतचा रस्ता अरुंद असून रस्त्याकडेला असलेल्या धोकादायक कडा तरी किमान भरा नाहीतर टोलवसुली बंद करा असे सांगत आहेत. अपघात घडल्यानंतरही महामार्गाच्या कडेला मुरूम थवा माती टाकण्यात आलेली नाही. गत काही दिवसांपासून वाहनधारकांची होणारी कसरत प्रशासनाला दिसत नाही का असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. महामार्गावर प्रवास करताना सुविधा मिळत नसल्याने नाहक अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष कायम होत आहे. त्यामुळे लाखोंचे टोल वसुली जाते कुठे अशी चर्चा होत आहे. रस्त्याकडेला उंच सखल भागात असल्याने प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. एकीकडे पावसामुळे रस्ता खराब झाला आहे, तर दुसरीकडे रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केले जात असल्याने आणखी किती जणांना बळी जाणार असा प्रश्न केला जात आहे.

बॉक्स दुचाकीधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने अतिवेगाने धावतात. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात व खड्डे चुकवण्याच्या नादात ही अवजड वाहने जणूकाही पाठीमागून आपल्याला धडकतात की काय या भीतीनेच दुचाकीधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. दररोजचेच समस्या असतानाही याकडे ना महामार्ग पोलिसांचे लक्ष आहे, ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे. त्यांना रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, धोकादायक रस्ता डोळ्याने दिसत नाही का असा प्रश्नही आहे.

बॉक्स

राष्ट्रीय सुविधांचा महामार्गावर अभाव

राष्ट्रीय सुविधांचा सुविधांचा अभाव दिसून येत आहे. कधी पथदिव्यांची समस्या, तर बाराही महिने रस्ता दुरुस्ती होत नसल्याने पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे साकोली ते भंडारा ते नागपूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला असतानाही याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे याच मार्गावर ठिकठिकाणी लाखोंची टोलवसुली केली जाते. लाखो रुपयांचा टोल नेमका जातो कुठे असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. ट्रक चालकांनाही योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने टोल वसुली बंद करा, असा अशी मागणी आहे.