शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:32 AM

आमगाव येथील शेतकरी रमेश बोंद्रे यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकरात उन्हाळी मुंग पिकाची लागवड केली. पीक जोमाने आले असताना ...

आमगाव येथील शेतकरी रमेश बोंद्रे यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकरात उन्हाळी मुंग पिकाची लागवड केली. पीक जोमाने आले असताना त्या पिकांवर रोगांने आक्रमण केले. आपोआप पाने पिवळी पडू लागल्याने त्या पिकांवर कोणत्या प्रकारची औषधे फवारावी हे त्यांना माहीत नसल्याने त्यांनी कृषी कार्यालय भंडारा येथे संपर्क केला. मात्र कृषी विभागाकडून त्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले नाही. फक्त तुमच्या क्षेत्रातील कृषी सहायक तुम्हाला मार्गदर्शन करणार असे सांगण्यात आले. यामुळे ते खाली हाताने परत आले. या शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषध उपचाराबाबत ज्ञान असल्याने ते कशा प्रकारे फवारावे हे माहीत नसल्याने यांनी आपल्या पिकांवर कोणत्याच प्रकारची फवारणी केली नाही. त्यामुळे आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले. शासन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना अमलात आणण्याची भाषा करीत असताना सुद्धा त्या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. परिसरामध्ये अनेक शेकऱ्यांची उपजीविका शेतीवर असून शेतामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. मात्र याबाबत योग्य प्रकारचे ज्ञान नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दुरुस्त होत नाही. यावर्षी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मात्र त्या पिकावर रोगांचे आक्रमण केले असून या पिकांवर कोणत्या प्रकारची औषधी फवारावी याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसतानाही कृषी केंद्र चालक जी औषधे देईल या पिकांवर फवारणी शेतकरी करीत आहेत. यामध्ये औषधीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने त्याची फसवणूक होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने गावागावात जनजागृती करून याबाबत शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.