शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:00 AM

खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देधानाची खरेदी झाली बंद : धानाची नासाडी, पोत्यांच्या सुरक्षिततेसाठी ताडपत्रीचे आच्छादन

  लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदानासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. धान खरेदी केंद्राचा  श्रीगणेशा अद्याप करण्यात आलेला नाही. केंद्र सुरू होण्याआधीच केंद्रावर विक्रीसाठी धानाची पोती पोहचली असल्याने अवकाळी पावसाचा फटका पोत्याना बसला आहे.  धान आणि पोत्यांना खुद्द शेतकऱ्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे. या परिसरात बपेरा, देवसरा, बिनाखी, चुल्हाड, सिंदपुरी, टेमनी, सुकली नकुल, सिहोरा, वाहनी, हरदोली, करकापूर, पिपरी चुनही, गोंडीटोला, दावेझरी, गोंदेखारी गावात धानाची खरेदी केंद्रावर करण्यात येत आहे. धान साठवणूक करण्यासाठी खाजगी गोडाऊन घेण्यात येत आहेत. परिसरात असणारे गोडाऊनमधील गेल्या वर्षातील धानाचे पोती रिकामे करण्यात आली आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान धान खरेदी केंद्र सुरु होणार असल्याच्या  अपेक्षेने शेतकऱ्यांनी धानाचे पोती केंद्रावर आणले आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आधी गोडाऊन रिकामे केल्याने एक चांगला संदेश शेतकऱ्यांत गेला आहे. धान खरेदी करताना गोडाऊनची समस्या निर्माण होणार नाही. धान खरेदी नंतर पोती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली  जातील. परंतु सध्या गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांनी धानाचे पोती उघड्यावर ठेवली आहेत. या पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन दिले आहेत.येथे सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नाहीत. परिसरात खरेदी केंद्रावरून धान पोती चोरी होण्याचे घटना आजवर घडल्या नाहीत. यामुळे केंद्र संचालक बेफिकीर राहत आहेत. या पोत्यांना  जनावरांची भीती आहे. कीटक पोत्यातील धानाची नासाडी करीत आहेत. नुकसानग्रस्त धानाचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. याशिवाय धान खरेदी करताना घट काढली जात आहे. यातही शेतकऱ्यांची गोची केली जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होत   आहे.  सिहोरा परिसरातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव   धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटालूट होत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. अतिरिक्त २ ते ३ किलो धानाची घट म्हणून कापले जात आहेत. यात रिकामे पोत्याचा वजन जोडले जात आहे. यावरून शेतकऱ्यांनी धान आणायचे कसे ? केंद्रावर धानाचे पोती उचल करणाऱ्या हमालांना दरानुसार राशी दिली जात आहे. असे असताना पुन्हा शेतकऱ्यांकडून हमाली वसुल करण्याचे आरोप होत आहेत. धान खरेदी केंद्रावर पारदर्शकता ठेवली पाहिजे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. यंदा शेतकरी चौफेर संकटात सापडला आहे. पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा, अवकाळी पाऊस, एकरी ३ पोते धानाचे उत्पादन झाल्याने शासनाने  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे.

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. वाहनी केंद्रावर धान पोती उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. यामुळे तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात यावी.- प्रल्हाद आगाशे, सरपंच, करकापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड