शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणी वाहते नाल्यातून : उन्हाळी धान पीक संकटात, शेतकरी हतबल

तुळशीदास रावते।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पांतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून संपूर्ण पाणी नाल्यात वाहून जात आहे. दुसरीकडे पाणी मिळणार नसल्याने धान पीक वाळण्याची भीती आहे. या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हरटॅक होऊन फुटला असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी डबघाईस आला आहे. आता धानाला पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. या कालव्यावर शेकडो एकर ओलीत केले जाते. परंतु आता हे पीक धोक्यात आले आहे. कालवा फुटल्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ कालवा पूर्ववत करावा अशी मागणी आहे.बघेडाच्या सरपंच प्रतिमा ठाकूर म्हणाल्या, सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा कालवा फुटला. शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. २० मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडावे असे त्यांनी सांगितले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले म्हणाले, कालवा फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे पाण्याअभावी शेतकºयांचा धान धोक्यात आला आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करावी.बावनथडी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच जोगीवाडा परिसराला मिळत आहे. काही कारणास्तव कालवा फुटला त्याची तात्काळ दुरुस्ती केल्या जाईल.-एल.डी. सिंग,सहाय्यक अभियंता, तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी