शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणी वाहते नाल्यातून : उन्हाळी धान पीक संकटात, शेतकरी हतबल

तुळशीदास रावते।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पांतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून संपूर्ण पाणी नाल्यात वाहून जात आहे. दुसरीकडे पाणी मिळणार नसल्याने धान पीक वाळण्याची भीती आहे. या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हरटॅक होऊन फुटला असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी डबघाईस आला आहे. आता धानाला पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. या कालव्यावर शेकडो एकर ओलीत केले जाते. परंतु आता हे पीक धोक्यात आले आहे. कालवा फुटल्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ कालवा पूर्ववत करावा अशी मागणी आहे.बघेडाच्या सरपंच प्रतिमा ठाकूर म्हणाल्या, सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा कालवा फुटला. शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. २० मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडावे असे त्यांनी सांगितले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले म्हणाले, कालवा फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे पाण्याअभावी शेतकºयांचा धान धोक्यात आला आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करावी.बावनथडी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच जोगीवाडा परिसराला मिळत आहे. काही कारणास्तव कालवा फुटला त्याची तात्काळ दुरुस्ती केल्या जाईल.-एल.डी. सिंग,सहाय्यक अभियंता, तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी