शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ने शेतकरी होऊ लागला समृद्ध

By admin | Updated: April 13, 2017 00:24 IST

निसर्गाच्या भरवशावर एक-दोन पाण्याने भात शेती जायची. रबी पीक घेणे दुरापास्त होते.

लोकमत शुभ वर्तमान : बंधाऱ्यांनी फुलविले हास्य, मोहाडी तालुक्यात सहा कोटींची कामेराजू बांते मोहाडीनिसर्गाच्या भरवशावर एक-दोन पाण्याने भात शेती जायची. रबी पीक घेणे दुरापास्त होते. पाणी टंचाई असलेल्या शिवारात जलयुक्त शिवार योजना राबविली गेली. पाणी साठवण होऊ लागले. संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले. भात पिक होऊ लागले. पिकाची हमी आल्याने शेतकऱ्यांमध्ये सुखद चित्र निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.सिंचन क्षेत्रात वाढवून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करण्याच्या हेतूने डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू झाली. सन २०१५-२०१६ पासून जलयुक्त शिवार अभियान प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेततळे, सिमेंट बंधारा दुरूस्ती, नाला खोलीकरण, मजगी पुनर्जिवन, बोडी नुतनीकरण, वृक्ष लागवड, साठवण बंधारा, साठवण बंधारा दुरुस्ती, मामा तलाव दुरुस्ती, साठवण तलाव, नाला सरळीकरण व खोलीकरण, कालवा दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी खैरलांजी अशा १५ गावांची या योजनेअंतर्गत विविध कामे घेण्यात आली. २८७ कामे पूर्ण झाली. या कामामुळे ४८५.३५ हेक्टर क्षेत्रात कामे करण्यात आली. त्यामुळे २४०६ एवढ्या क्षेत्रात दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करता आला. २०१६-१७ यावर्षी महालगाव, डोंगरगाव, चिचोली, पाडोंगरी, आंधळगाव, नवेगाव, धोप, ताडगाव, जांब, हिवरा अशी १० गाव निवडण्यात आली. ९८.०७ हेक्टर क्षेत्रामध्ये १४२ कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे ४४५.१६ हेक्टरमध्ये दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाने व अन्य यंत्रनेने शेततळे, नालाखोली करण्याची कामे केली. त्यामुळे प्रखर उन्हाळ्यात ही कांद्री, खैरलांजी, बच्छेरा आदी गावाच्या नाल्यात व शेततळ्यात पाणी दिसू लागले आहे. दुरवर पाण्याचा शोध नसताना अशा स्थितीत पक्षी, जनावरे, माकडे या साठवलेल्या पाण्याने तृष्णा भागवत असल्याचे दिसून आले. दोन वर्षापुर्वी कांद्री सुखदेव मांढरे यांनी जलशिवारातून शेततळे तयार केले. पाऊण एकरात भात, गहू, वांगा ही पिके घेतात. सोबतच मत्स्य पालन सुरू केले. शेततळ्यात सिंचित जलसाठ्यावर उदर निर्वाह करीत आहे. बच्छेरा येथील भरत शहरे यांची पडीक जमीन होती. नाला खोलीकरण व बंधारा दुरूस्तीनंतर पाणी साठवण होत गेल्यामुळे लगतची शेतजमीन सुपीक झाली. आता एक वर्षापासून धान, गहू, वांग्याचा पीक घेत आहे. पडीक जागेला समृध्द करण्याची किमया पाणी साठवणीमुळे झाली. बच्छेऱ्यात तर आधी नाला खोलीकरण होवू दयायच नाही अशी काही लोकांची भुमिका होती. ज्यांना या नाला खोलीकरणाचा त्रास होणार होता अशांनी अधिकाऱ्यांचा बोलण्यावर विश्वास ठेवला. आज विरोध करणारेच म्हणतात, साहेबांमुळे आम्ही समृध्द होवू लागलोय, ही प्रतिक्रीया नीळकंठ झंझाड देताना चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.करडी क्षेत्रात मागीलवर्षी पाऊस कमी झाला होता. नाल्यात साठवण झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर रोवणी केली. दोनशे मीटर अंतरपर्यंत शेतकऱ्यांनी नाल्यातील पाणी नेले. धानपिक हाती आणता आले. एवढेच नाही, करडीक्षेत्र व मोहाडी क्षेत्रात मजगीच्या कामामुळे ४४ हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली जलशिवार योजनेमुळे आणता आली. दोन वर्षात २ हजार ८५१ हेक्टर क्षेत्रासाठी जलयुक्त शिवारमुळे टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. दोन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचा फायदा आज दिसून येत आहे. पुढेही जलयुक्त शिवाराच्या कामाचे फायदे चांगले परिणामकारक होतील, असे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी सांगितले.