शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अपसंपदा जमविल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या आठ प्रकरणांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:06 IST

भंडारा : शासनाने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असला तरीदेखील आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एसीबीकडून ...

भंडारा : शासनाने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असला तरीदेखील आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एसीबीकडून अनेकदा सापळा रचून प्रचंड प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एकंदरीत भ्रष्टाचार ही शासकीय यंत्रणेला लागलेली कीड काही केल्या जात नाही. जिल्ह्यात अजून तरी तिचे समूळ नष्ट होत नाही, असे चित्र कायम आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अशा अनेक तक्रारी येत असतात. या तक्रारींची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ सापळा रचून अनेक कारवाया गत वर्षभरात केल्या आहेत. एसीपी पथकाकडे तक्रार येताच तक्रारदाराशी संपर्क साधून सत्यता पडताळली जाते. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये चौकशी करायची असल्यास विभागप्रमुखांची परवानगी आवश्यक असते. अन्यथा इतर सर्वच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी घेण्याची गरज नसते. असे असले तरी जिल्ह्यात २०१९-२० मध्ये ३० कारवाया करण्यात आल्या आहेत. सन २०१९ मध्ये सक्षम अधिकारी परवानगीसाठी ११ प्रकरणे तर सन २०२० मध्ये सहा प्रकरणे सक्षम अधिकारी परवानगीविना प्रलंबित आहेत. यासोबतच अपसंपदा जमविल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आठ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सन २०१५ व १७ मधील काही प्रकरणे आजही प्रलंबित आहेत. यासोबतच मंत्रालय स्तरावर एक प्रकरण प्रलंबित आहे. एसीबी पथकामध्ये कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता राखली जाते. तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त होताच सापळा रचला जातो. मात्र, याची माहिती चक्क लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही दिली जात नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांनी सांगितले. तक्रारकर्त्यांकडून माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना, इतर कोणालाही याची कल्पना दिली जात नाही. लाखांदूर तहसीलदारांवर एसीपीची झालेली कारवाई शासकीय अधिकारी, कर्मचारी, रेती तस्करांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात असलेला प्रचंड रेतीसाठा व त्यातून मोठ्या प्रमाणात रेतीशी संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी पैशाची मागणी, यामुळेही मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत असल्याचे चित्र आहे. नेमक्या आकडेवारीत जरी सांगता आले नाही तरीदेखील जिल्ह्यात महसूल विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांमध्ये अनेक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. त्यासोबतच जिल्ह्यात अपसंपदा जमविल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आठ प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे.

बॉक्स

कारवाईसाठी रेती तस्करीही ठरतेय कारणीभूत

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे रेती तस्करी गेल्या काही वर्षांपासून जोमात सुरू आहे. जिल्ह्यातील या रेतीला संपूर्ण विदर्भात प्रचंड मागणी आहे. शासनाकडून लिलावाची प्रक्रिया अनेक दिवस रखडली होती. रेती तस्करांकडून होणाऱ्या अवैध रेती तस्करीचा फायदा काही अधिकारी, कर्मचारी उचलतात. रेती तस्करांना पैशाची मागणी करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रेती तस्करांसह रेती वाहतूक या कारणांमुळे एसीबीच्या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत.

कोट

तक्रार कर्ता १०६४ या नंबरवर फोन करू शकतो. तक्रारकर्त्याशी संपर्क करून खातरजमा करून तात्काळ कारवाई करण्यात येते. काही बाबी गोपनीय असल्याने कोणाची भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू आहे किंवा नाही हे सांगता येत नाही. इतकेच नव्हे तर एसीपीकडून कारवाई करताना कोणावर कारवाई होणार हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील माहिती नसते.

महेश चाटे, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा.