शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

शाळेत सीसीटीव्ही लावा, अन्यथा शाळेची मान्यता घालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:21 IST

Bhandara : शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : शाळेत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी एका महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अन्यथा शाळेची मान्यता व अनुदान रोखण्यात येईल. अशी कठोर कारवाई करण्यात येईल, अशा संदर्भातील पत्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संयुक्तपणे काढले आहे.

बदलापूर घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षितताविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, यासाठी जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. शाळा परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णय जारी झाल्यापासून एक महिन्याच्या आत शाळेत प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तर लावाच, शिवाय त्यातील फुटेज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासावे. आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास पोलिस विभागासोबत संपर्क साधायचे आहे

पुढील कारवाई मुख्याध्यापकांना करायची आहे. सीसीटीव्ही लावण्याचे कार्य एका महिन्याच्या आत करण्यात आले नाही तर शाळेची मान्यता काढणे तसेच अनुदान रोखण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेबाबत लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार घडताना आढळून येतात समाजाचा या घटनेकडे बघण्याच्या दृष्टिकोन संवेदनशील असतो. त्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन एका आठवड्यात करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे.

नियुक्त्ती वेळी घ्या काळजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्त्ती करताना नियुक्त्त कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यात यावी. पोलिस विभागाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवावा, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करताना सहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. 

तक्रारपेटी आवश्यक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत तक्रारपेटी बसवण्यात यावी. तक्रारपेटीबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. परिपत्रकानुसार तक्रारपेटीच्या संदर्भात पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाbhandara-acभंडारा