शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

By युवराज गोमास | Published: May 02, 2024 4:56 PM

Bhandara : जिल्हाभरात आठ भरारी पथके गठीत; राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना

भंडारा : खरीप हंगाम तोंडावर येवून ठेवला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर सात व जिल्हास्तरावर एक असे आठ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे खरिपासाठी जमिनीची नागरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. याशिवाय उन्हाळी धान कापणीला तसेच मळणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. परंतु, अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतीची कामे सध्या रेंगाळत चालली आहेत. उन्हाळी कामे संपताच खरीपाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

...तर परवानाही होणार निलंबित

खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

प्रत्येक तालुक्यात एक पथक

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आदी ७ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रताणे सात भरारी पथकांचे गठण कृषी विभागाचे आदेशान्वये करण्यात आले आहे. यासोबतच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, वेळीच तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथक

तालुकास्तरावर सात भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शासनाचे सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाचा मोबाईल नंबरवर बियाणे, खते, किटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच किंवा इतर शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केल्यानंतर मिळालेले परिणाम लक्षात घेवून बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षीत आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यतापात्र कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे ७०५८२१७९७७ या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आठ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.- विराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी