शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही वाढतोय हृदयविकार, वेळीच व्यसनांना घाला वेसण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:36 IST

Bhandara : तरुणांतही प्रमाण अधिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : हृदयविकार आता वयाचे बंधन नाही. अलीकडे ऐन तारुण्यात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी शहरी भागात असणारे प्रमाण आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच सावध होत व्यसन टाळणे हिताचे ठरणारे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार हिताचा ठरणारा आहे.

दरवर्षी हृदयविकारामुळे ३२ टक्के लोकांना जीव गमवावा लागतो. पूर्वी हृदयविकाराचा आजार हा साधारणतः पन्नाशीनंतर येत असे. कुठलाही त्रास न होता झटक्यात मरण येत आहे. हल्ली तिशीतील तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 'रिस्क फॅक्टर ओळखा अन् हृदयविकार टाळा,' असा मौलिक सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यापूर्वी हा आजार शहरी भागापुरताच मर्यादित होता; परंतु ग्रामीण भागातही या आजाराचे प्रमाण वाढले आहे. 

भविष्यात असंसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ या आजाराची होईल. यामध्ये कॅन्सर, हृदयविकार, हायपरटेन्शन तथा मधुमेह आदी आजारांचा समावेश राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृत्यूचे मोस्ट कॉमन कॉझ हे हृदयविकार आहे. लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांना कुठलेच व्यसन नाही किंवा जे शाकाहारी आहेत, त्यांच्यात व्हिटॅमिन १२ ची कमतरता आढळते. त्यामुळे होमोसिस्टिल होऊन हृदयविकाराची शक्यता बळावते, असे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितले. सावधानता अतिशय गरजेची आहे.

पन्नाशीनंतर दोन तपासणी गरजेची नागरिकांनो, रिस्क फॅक्टर ओळखा. हृदयाशी निगडित काही लक्षणे आढळल्यावर वेळेवर उपचार घ्या. टाइम इज मसल्स असे डॉक्टर म्हणतात. त्यामुळे वेळेचे भान ठेवून निर्णय घेतला पाहिजे.हृदयविकाराची समस्या आल्यास ६० मिनिटांच्या आत उपचार झाल्यास निश्चितच रुग्णाचे प्राण वाचतात. त्यामुळे वयाच्या ४० वर्षांपर्यंत दोन वर्षांतून एकदा डको व टीएमटी करणे गरजेचे आहे. वयाच्या पन्नाशीनंतर वर्षातून एकदा ही चाचणी करावी, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अशी आहेत हृदयविकाराची कारणे हृदयविकाराला तंबाखूचे सेवन घातक आहे. अलीकडे युवकांमध्ये हे प्रमाण अधिक वाढले आहे. अंग मेहनत करण्याचा आळसही याला कारणीभूत आहे. नेहमीच्या जीवनशैलीत काही बदल आल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावाः मात्र युवकांकडून अॅसिडिटीच्या नावाखाली त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रकृती थोडीच बिघडली, असा विचार करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.

"अलीकडे व्यसनाधीनता वाढली आहे. झोपेचा अभाव, ताणतणावामुळे हृदयविकाराचा धोका संभवत आहे. धोका टाळण्यासाठी नैसर्गिक फलाहार करावा, ऑडली पदार्थ कमी खावे, नियमित व्यायाम करावा, खाण्यावर नियंत्रण ठेवावे. हृदयासंबंधी काही समस्या लक्षात येताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा." - डॉ. प्रफुल्ल नंदेश्वर, हृदयरोग तज्ज्ञ, भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा