शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याबाबत जागरूक पण साेशल मीडिया वापरात बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला ...

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला जात हाेता. कुठेही चमचमीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारला जात हाेता. परंतु आता अगदी साध्या जेवणाकडे सर्वांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. तेलकट पदार्थांऐवजी फळांचा वापर जेवणात वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यांकडे अनेकजण वळले असून हाॅटेलपेक्षा घरीच जेवणाकडे कल वाढला आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पहाटे फिरायला जाणे, व्यायाम हाही आता अनेकांच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे.

काेराेना संसर्गामुळे अनेकांची मन:स्थिती बिघडली आहे. काेराेनाच्या संकटाने अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येत आहे. कुटुंबात विसंवाद वाढत आहे. सतत माेबाईलवर राहत असल्याने डाेळ्याचे आजार जडले असून अनेकांची झाेप उडाली आहे. अशा व्यक्तींचे समुपदेशन करण्याची गरज आहे. मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. रत्नाकर बांडेबुचे म्हणाले, सकारात्मक विचार हा यावरचा प्रभावी उपाय आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, डाेक्यात आलेले विचार तणावपूर्ण असतील ते इतरांशी शेअर करावे, एखादा छंद जाेपासावा, माेबाईल व इंटरनेटचा वापर गरजेपुरता करावा, असे त्यांनी सांगितले.

काेराेना संकटाने अनेकांना माेबाईलचे व्यसन जडले आहे. माेबाईलवर येणारा प्रत्येक संदेश खरा मानणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अलीकडे काेराेनाबाबतच्या विविध माहितींचा खच साेशल मीडियातून पडत आहे. यातील नेमके खरे काेणते आणि खाेटे काय, हे कळायला मार्ग नसताे. मात्र अनेकजण त्यावर येणारी माहिती खरी मानत आहेत. काेराेनावर विविध उपाय सांगून दिशाभूल करणारे मॅसेजही साेशल मीडियातून फिरत असतात. मात्र अशा मॅसेजबाबत कुणी तक्रार करीत नाही की कारवाईही केली जात नाही. जे साेशल मीडियात आले ते खरे मानून अनेकजण पॅनिक हाेत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. यासाठी प्रत्येकाने सदसदविवेक बुध्दीचा वापर करावा. काेणताही उपचार करण्यापूर्वीचा डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तर सायबर कायद्यांतर्गत हाेऊ शकते कारवाई

n अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून आराेग्य असाे की इतर काेणत्याही बाबतीत अफवा पसरविणे गुन्हाच आहे. कुणी याबाबत तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असे भंडाराचे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याचे अकाऊंट थांबविण्यापासून माेबाईल, कॉम्प्युटर व इतर डिव्हाईस जप्त करण्याची कारवाई करता येते. फेक आयडी असणाऱ्यांचाही शाेध घेतला जाताे. यासाठी तक्रारीची गरज असल्याचे भारती यांनी सांगितले.