शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:18 IST

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती : कृषी विभाग व आत्माचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसायासोबतच शेतमाल साठवणूक गोदामात माल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचीही यावेही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.भंडारा तालुक्यातील गणेशपूर प्रोडूसर कंपनीची सभा गणेशपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लाड यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आढावा, पिकनिहाय लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असणारी आवाहने आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांनी गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपली भागीदारी वाढविल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटांच्या सभासदांना व इतरही शासकीय योजनांसाठी मदत केली जाईल, असे सांगितले.त्यानंतर पुढे बोलताना आत्माचे बी.टी.एम. सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कवडीमोल भावात विक्री न करता कंपनीकडे असणाºया गोदामात धान्य ठेवल्यास मालाच्या ७० टक्के किंमत शेतकºयांना मिळू शकेल व शासनाच्या सबसीडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिखलीचे प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून तालुका स्तरावर शेतकºयांच्या गटनिमिर्ती विषयी मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान असून शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर ही शेतकºयांसाठी कंपनीचे सभासद होवून एकत्र येत शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी आवाहन केले.यावेळी अनेक शेतकºयांनी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आल्यापासून कृषी विभागाशी शेतकºयांचा असलेला सहभाग वाढवल्याचेही मनोगतात सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरीप सभेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आत्माचे बीटीएम सतीश वैरागडे, संजय एकापुरे, प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने, अनिल नौकरकर, निलेश गाढवे, देवानंद चौधरी, पवन कटणकर, हरेंद्र रहांगडाले, वापकोचे अधिकारी पंकज गिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेगटशेती आणि शेतकरी उत्पादक संस्थेत शेतकºयांची संख्या वाढल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. समूह वाढल्याने शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होतो. त्यासाठीच शेतकऱ्यांनी गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी