शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:18 IST

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती : कृषी विभाग व आत्माचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसायासोबतच शेतमाल साठवणूक गोदामात माल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचीही यावेही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.भंडारा तालुक्यातील गणेशपूर प्रोडूसर कंपनीची सभा गणेशपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लाड यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आढावा, पिकनिहाय लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असणारी आवाहने आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांनी गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपली भागीदारी वाढविल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटांच्या सभासदांना व इतरही शासकीय योजनांसाठी मदत केली जाईल, असे सांगितले.त्यानंतर पुढे बोलताना आत्माचे बी.टी.एम. सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कवडीमोल भावात विक्री न करता कंपनीकडे असणाºया गोदामात धान्य ठेवल्यास मालाच्या ७० टक्के किंमत शेतकºयांना मिळू शकेल व शासनाच्या सबसीडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिखलीचे प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून तालुका स्तरावर शेतकºयांच्या गटनिमिर्ती विषयी मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान असून शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर ही शेतकºयांसाठी कंपनीचे सभासद होवून एकत्र येत शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी आवाहन केले.यावेळी अनेक शेतकºयांनी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आल्यापासून कृषी विभागाशी शेतकºयांचा असलेला सहभाग वाढवल्याचेही मनोगतात सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरीप सभेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आत्माचे बीटीएम सतीश वैरागडे, संजय एकापुरे, प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने, अनिल नौकरकर, निलेश गाढवे, देवानंद चौधरी, पवन कटणकर, हरेंद्र रहांगडाले, वापकोचे अधिकारी पंकज गिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेगटशेती आणि शेतकरी उत्पादक संस्थेत शेतकºयांची संख्या वाढल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. समूह वाढल्याने शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होतो. त्यासाठीच शेतकऱ्यांनी गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी