शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:18 IST

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती : कृषी विभाग व आत्माचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसायासोबतच शेतमाल साठवणूक गोदामात माल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचीही यावेही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.भंडारा तालुक्यातील गणेशपूर प्रोडूसर कंपनीची सभा गणेशपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लाड यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आढावा, पिकनिहाय लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असणारी आवाहने आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांनी गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपली भागीदारी वाढविल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटांच्या सभासदांना व इतरही शासकीय योजनांसाठी मदत केली जाईल, असे सांगितले.त्यानंतर पुढे बोलताना आत्माचे बी.टी.एम. सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कवडीमोल भावात विक्री न करता कंपनीकडे असणाºया गोदामात धान्य ठेवल्यास मालाच्या ७० टक्के किंमत शेतकºयांना मिळू शकेल व शासनाच्या सबसीडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिखलीचे प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून तालुका स्तरावर शेतकºयांच्या गटनिमिर्ती विषयी मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान असून शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर ही शेतकºयांसाठी कंपनीचे सभासद होवून एकत्र येत शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी आवाहन केले.यावेळी अनेक शेतकºयांनी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आल्यापासून कृषी विभागाशी शेतकºयांचा असलेला सहभाग वाढवल्याचेही मनोगतात सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरीप सभेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आत्माचे बीटीएम सतीश वैरागडे, संजय एकापुरे, प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने, अनिल नौकरकर, निलेश गाढवे, देवानंद चौधरी, पवन कटणकर, हरेंद्र रहांगडाले, वापकोचे अधिकारी पंकज गिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेगटशेती आणि शेतकरी उत्पादक संस्थेत शेतकºयांची संख्या वाढल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. समूह वाढल्याने शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होतो. त्यासाठीच शेतकऱ्यांनी गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी