शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

अंत्यसंस्कारासाठी जायचं, रांगेत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:10 IST

रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.

ठळक मुद्देकन्हाळगाव ग्रामस्थांमध्ये संताप : मुरमाच्या रस्त्यावर मातीकाम, ग्राम प्रशासनाचे दुर्लक्ष

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावकरी शिस्तीत वागतात. स्मशानभूमीवरही जाण्यासाठी रांगेत आपोआप लागतात. हे वाचून धक्का बसेल. पण, हे खरं आहे. मुरमाच्या रस्त्यावर माती घातली गेली. तो रस्ता चिखलमय होतो. एक किलोमीटर चिखलातून पायवाट काढत अंत्यसंस्कार करण्याच्या स्थळावर पोहचण्यासाठी चक्क रांगेत लागावे लागते, असा आश्चर्यकारक चित्र कान्हळगाव (सिरसोली) येथे बघायला मिळते.रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.कान्हळगाव येथे ऑगस्ट महिन्यात तीन जणांचे निधन झाले. या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हरण्याघाटावर नेण्यात आले. पावसाळा असल्याने हरण्याघाटचा रस्ता पूर्णत: चिखलमय झालेला आहे. हरण्याघाटावरील नदीवर पोहचण्यासाठी लोकांना एक किलोमीटर चिखल तुडवत जावे लागते. चिखलमय रस्त्यातून एक पायवाट काढली जाते. अंत्यसंस्कारासाठी बाहेरून आलेले आप्तेष्ट व गावकरी हरण्यानदीवर पोहचत पर्यंत सगळे एका रांगेत चालतात.चिखल तुडवत सर्वच लोक शिस्तीत रांगेत येतात. चिखलमय रस्त्याने रांगेत चालण्याची शिस्त लावून दिली अशी उपरोधीक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. भर पावसाळ्यात चारचाकी, मोटारसायकल, सायकल नदीपर्यंत पोहचत होती. आता त्या रस्त्याने चालणे अवघड होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेतीवर जाणाऱ्या या चिखलमय रस्त्याचा

दररोजचा प्रवास करावा लागतो.रोजगार हमी योजनेत कोणते रस्ते घ्यावे, घेऊ नये याचे नियोजन ग्रामपंचायतने केले नाही. त्यामुळे हरण्या घाट व तितीरमाºया रस्त्याने जाणाºया शेतकऱ्यांना दररोज चिखलातून पायवाट काढण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता मातीकामाची गरज नव्हती. चांगले रस्ते मातीमय झाले. आता पुन्हा या मुरुम रस्त्यावर माती जबरदस्तीने पाडली गेली. त्यानंतर मुरुम पडणार काय की हा त्रास असाच सहन करावा लागणार असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा