शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अंत्यसंस्कारासाठी जायचं, रांगेत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:10 IST

रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.

ठळक मुद्देकन्हाळगाव ग्रामस्थांमध्ये संताप : मुरमाच्या रस्त्यावर मातीकाम, ग्राम प्रशासनाचे दुर्लक्ष

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावकरी शिस्तीत वागतात. स्मशानभूमीवरही जाण्यासाठी रांगेत आपोआप लागतात. हे वाचून धक्का बसेल. पण, हे खरं आहे. मुरमाच्या रस्त्यावर माती घातली गेली. तो रस्ता चिखलमय होतो. एक किलोमीटर चिखलातून पायवाट काढत अंत्यसंस्कार करण्याच्या स्थळावर पोहचण्यासाठी चक्क रांगेत लागावे लागते, असा आश्चर्यकारक चित्र कान्हळगाव (सिरसोली) येथे बघायला मिळते.रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.कान्हळगाव येथे ऑगस्ट महिन्यात तीन जणांचे निधन झाले. या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हरण्याघाटावर नेण्यात आले. पावसाळा असल्याने हरण्याघाटचा रस्ता पूर्णत: चिखलमय झालेला आहे. हरण्याघाटावरील नदीवर पोहचण्यासाठी लोकांना एक किलोमीटर चिखल तुडवत जावे लागते. चिखलमय रस्त्यातून एक पायवाट काढली जाते. अंत्यसंस्कारासाठी बाहेरून आलेले आप्तेष्ट व गावकरी हरण्यानदीवर पोहचत पर्यंत सगळे एका रांगेत चालतात.चिखल तुडवत सर्वच लोक शिस्तीत रांगेत येतात. चिखलमय रस्त्याने रांगेत चालण्याची शिस्त लावून दिली अशी उपरोधीक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. भर पावसाळ्यात चारचाकी, मोटारसायकल, सायकल नदीपर्यंत पोहचत होती. आता त्या रस्त्याने चालणे अवघड होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेतीवर जाणाऱ्या या चिखलमय रस्त्याचा

दररोजचा प्रवास करावा लागतो.रोजगार हमी योजनेत कोणते रस्ते घ्यावे, घेऊ नये याचे नियोजन ग्रामपंचायतने केले नाही. त्यामुळे हरण्या घाट व तितीरमाºया रस्त्याने जाणाºया शेतकऱ्यांना दररोज चिखलातून पायवाट काढण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता मातीकामाची गरज नव्हती. चांगले रस्ते मातीमय झाले. आता पुन्हा या मुरुम रस्त्यावर माती जबरदस्तीने पाडली गेली. त्यानंतर मुरुम पडणार काय की हा त्रास असाच सहन करावा लागणार असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा