शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी जायचं, रांगेत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:10 IST

रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.

ठळक मुद्देकन्हाळगाव ग्रामस्थांमध्ये संताप : मुरमाच्या रस्त्यावर मातीकाम, ग्राम प्रशासनाचे दुर्लक्ष

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावकरी शिस्तीत वागतात. स्मशानभूमीवरही जाण्यासाठी रांगेत आपोआप लागतात. हे वाचून धक्का बसेल. पण, हे खरं आहे. मुरमाच्या रस्त्यावर माती घातली गेली. तो रस्ता चिखलमय होतो. एक किलोमीटर चिखलातून पायवाट काढत अंत्यसंस्कार करण्याच्या स्थळावर पोहचण्यासाठी चक्क रांगेत लागावे लागते, असा आश्चर्यकारक चित्र कान्हळगाव (सिरसोली) येथे बघायला मिळते.रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.कान्हळगाव येथे ऑगस्ट महिन्यात तीन जणांचे निधन झाले. या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हरण्याघाटावर नेण्यात आले. पावसाळा असल्याने हरण्याघाटचा रस्ता पूर्णत: चिखलमय झालेला आहे. हरण्याघाटावरील नदीवर पोहचण्यासाठी लोकांना एक किलोमीटर चिखल तुडवत जावे लागते. चिखलमय रस्त्यातून एक पायवाट काढली जाते. अंत्यसंस्कारासाठी बाहेरून आलेले आप्तेष्ट व गावकरी हरण्यानदीवर पोहचत पर्यंत सगळे एका रांगेत चालतात.चिखल तुडवत सर्वच लोक शिस्तीत रांगेत येतात. चिखलमय रस्त्याने रांगेत चालण्याची शिस्त लावून दिली अशी उपरोधीक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. भर पावसाळ्यात चारचाकी, मोटारसायकल, सायकल नदीपर्यंत पोहचत होती. आता त्या रस्त्याने चालणे अवघड होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेतीवर जाणाऱ्या या चिखलमय रस्त्याचा

दररोजचा प्रवास करावा लागतो.रोजगार हमी योजनेत कोणते रस्ते घ्यावे, घेऊ नये याचे नियोजन ग्रामपंचायतने केले नाही. त्यामुळे हरण्या घाट व तितीरमाºया रस्त्याने जाणाºया शेतकऱ्यांना दररोज चिखलातून पायवाट काढण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता मातीकामाची गरज नव्हती. चांगले रस्ते मातीमय झाले. आता पुन्हा या मुरुम रस्त्यावर माती जबरदस्तीने पाडली गेली. त्यानंतर मुरुम पडणार काय की हा त्रास असाच सहन करावा लागणार असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा