शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मासेमारी बंद पडली, जल पर्यटनाचा रोजगार समाजाला द्या; ढीवर समाजबांधव करणार जलसमाधी आंदोलन

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 26, 2024 18:41 IST

उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे ढीवर समाजाचे मोठे नुकसान झाले. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली धरणासमोरील मासेमारी बंद पडली. डांगर-टरबुजाच्या वाड्या नष्ट झाल्या. उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

या प्रकल्पामुळे सर्वाधिक नुकसान ढीवर समाजाचे झाल्याची जनभावना आहे. शेतकरी, धरणग्रस्तांना मोबदला देण्यात आला. पण ज्या समाजाचा उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता, त्या समाजाच्या प्रपंचाकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. याचाच विरोध करत गोसे प्रकल्पावर तयार होत असलेल्या जल पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगारात १०० टक्के आरक्षण भंडारा जिल्ह्याला देण्यात यावे व ५० टक्के प्राधान्य पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला देण्याची मागणी विदर्भ युवा क्रांती ढीवर समाज संघटनेकडून करण्यात येत आहे.

समाजाच्या या मागणीसाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे विनवण्या करूनही लक्ष दिले जात नसल्याने विदर्भ युवा ढीवर समाज संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्यासह अनेक ढीवर समाज बांधवांनी गोसे धरणावरून पाण्यात उडी मारून जलसमाधी घेणार असल्याची साद दिली आहे. यामुळे मंगळवारी धरणावर हजारो ढीवर समाजबांधव जमा होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

ढीवर समाजाकडे दुर्लक्ष केलेल्या प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत. जीवंतपणी समाजाला वाऱ्यावर सोडले. किमान आमच्या मृत्यूनंतर तरी शासन या दुर्लक्षित समाजाकडे लक्ष देईल.- हर्षल वाघमारे, अध्यक्ष, विदर्भ युवा ढीवर समाज संघटना 

टॅग्स :agitationआंदोलनDamधरण