शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मासेमारी बंद पडली, जल पर्यटनाचा रोजगार समाजाला द्या; ढीवर समाजबांधव करणार जलसमाधी आंदोलन

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 26, 2024 18:41 IST

उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे ढीवर समाजाचे मोठे नुकसान झाले. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली धरणासमोरील मासेमारी बंद पडली. डांगर-टरबुजाच्या वाड्या नष्ट झाल्या. उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

या प्रकल्पामुळे सर्वाधिक नुकसान ढीवर समाजाचे झाल्याची जनभावना आहे. शेतकरी, धरणग्रस्तांना मोबदला देण्यात आला. पण ज्या समाजाचा उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता, त्या समाजाच्या प्रपंचाकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. याचाच विरोध करत गोसे प्रकल्पावर तयार होत असलेल्या जल पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगारात १०० टक्के आरक्षण भंडारा जिल्ह्याला देण्यात यावे व ५० टक्के प्राधान्य पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला देण्याची मागणी विदर्भ युवा क्रांती ढीवर समाज संघटनेकडून करण्यात येत आहे.

समाजाच्या या मागणीसाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे विनवण्या करूनही लक्ष दिले जात नसल्याने विदर्भ युवा ढीवर समाज संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्यासह अनेक ढीवर समाज बांधवांनी गोसे धरणावरून पाण्यात उडी मारून जलसमाधी घेणार असल्याची साद दिली आहे. यामुळे मंगळवारी धरणावर हजारो ढीवर समाजबांधव जमा होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

ढीवर समाजाकडे दुर्लक्ष केलेल्या प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत. जीवंतपणी समाजाला वाऱ्यावर सोडले. किमान आमच्या मृत्यूनंतर तरी शासन या दुर्लक्षित समाजाकडे लक्ष देईल.- हर्षल वाघमारे, अध्यक्ष, विदर्भ युवा ढीवर समाज संघटना 

टॅग्स :agitationआंदोलनDamधरण