शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

मासेमारी बंद पडली, जल पर्यटनाचा रोजगार समाजाला द्या; ढीवर समाजबांधव करणार जलसमाधी आंदोलन

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 26, 2024 18:41 IST

उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे ढीवर समाजाचे मोठे नुकसान झाले. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली धरणासमोरील मासेमारी बंद पडली. डांगर-टरबुजाच्या वाड्या नष्ट झाल्या. उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.

या प्रकल्पामुळे सर्वाधिक नुकसान ढीवर समाजाचे झाल्याची जनभावना आहे. शेतकरी, धरणग्रस्तांना मोबदला देण्यात आला. पण ज्या समाजाचा उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता, त्या समाजाच्या प्रपंचाकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. याचाच विरोध करत गोसे प्रकल्पावर तयार होत असलेल्या जल पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगारात १०० टक्के आरक्षण भंडारा जिल्ह्याला देण्यात यावे व ५० टक्के प्राधान्य पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला देण्याची मागणी विदर्भ युवा क्रांती ढीवर समाज संघटनेकडून करण्यात येत आहे.

समाजाच्या या मागणीसाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे विनवण्या करूनही लक्ष दिले जात नसल्याने विदर्भ युवा ढीवर समाज संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्यासह अनेक ढीवर समाज बांधवांनी गोसे धरणावरून पाण्यात उडी मारून जलसमाधी घेणार असल्याची साद दिली आहे. यामुळे मंगळवारी धरणावर हजारो ढीवर समाजबांधव जमा होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

ढीवर समाजाकडे दुर्लक्ष केलेल्या प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत. जीवंतपणी समाजाला वाऱ्यावर सोडले. किमान आमच्या मृत्यूनंतर तरी शासन या दुर्लक्षित समाजाकडे लक्ष देईल.- हर्षल वाघमारे, अध्यक्ष, विदर्भ युवा ढीवर समाज संघटना 

टॅग्स :agitationआंदोलनDamधरण