शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

मोहाडी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:28 IST

विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले.१३ डिसेंबर २०१७ ला विधानसभेवर मासेमार बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जी आश्वासने दिली होती ती पाळण्यात आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत विमाप्र व विमुक्त भटक्या जमातींना स्वतंत्र १३ टक्के आरक्षण द्यावे, लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करून सवलती देण्यात याव्या, तलाव ठेका रक्कम ५० टक्के कमी करण्यात यावी, मच्छीमार संस्थांना १८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे देण्यात येणारा ठेका कमी करण्यात यावा,मासेमार समाजाला १९६६ च्या कलम १६८ नुसार मासेमारीचा हक्क राजस्व रेकॉर्डवर चढविण्यात यावा, संस्था नोंदणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मोठे भांडवलदार समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून संस्था नोंदणी करून ओपन टेंडरच्या नावाखाली परंपरागत मासेमारांना बेदखल केले जात आहे. त्यावर अंकुश लावण्यात यावा, पेसा कायद्यानुसार तलावातील मासेमारीचे हक्क ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने मच्छीमारांवर संकट कोसळले आहे.तो कायदा रद्द करण्यात यावा, वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगल परिसरातील तलावावर मासेमारी करण्यास अटकाव केल्या जात आहे. त्यामुळे वंश परंपरागत मासेमारी करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, निलक्रांती योजनेच्या पैशाची होत असलेली लुट थांबवून खºया लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावा, निलक्रांती योजनेतील गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, माजी खासदार जतीराम बर्वे यांची कर्मभूमी हीच मासेमारांची दीक्षाभूमी असल्याने त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यात यावे, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रकरणी त्वरीत निकाली काढण्यात यावे, घरकुल योजनेत मासेमार बांधवांना अग्रक्रम देण्यात यावा व घरकुलाची किंमत ३.१५ लक्ष ठरविण्यात यावी, वनवासी भटक्या जमातींनी केलेले अतिक्रमण नियमित करून मालकी हक्क देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी कमलेश कनोजे, खुशाल कोसरे, मधुकर मारबते, हनेश माहालगावे, ज्ञानेश्वर मारबते, नरेश देवगडे, गणेश मारबते, हरिश्चंद्र बर्वे, रविंद्र मारबते, देवराम बांगडकर, सुनिल वलथरे, इस्तारी बर्वे, भोजराम नागपुरे, प्रकाश डोंगरवार, नगरसेवक कविता बावणेसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा