शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पूर्व विदर्भातील ३१ हजार हेक्टरवरील रोवणी उलटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:36 PM

पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभात उत्पादक दुष्काळाच्या उंबरठ्यावरपावसाचा दीर्घ खंड

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पऱहे पिवळे पडत असून रोवणी झालेल्या शेताला तडे पडले आहेत. अपुऱ्या पावसाने भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार १८७ हेक्टरवर भात पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा अपुºया पावसामुळे १५ जुलैपर्यंत केवळ ३१ हजार ६९१ हेक्टरवर म्हणजे ४ टक्केच रोवणी आटोपली आहे. भाताचा पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना निराश केले. मध्यंतरी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पऱहे टाकले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेवर रोवणी केली. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यात सारखी उन तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱहे पिवळे पडत आहे. पऱहे वाचविण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व इतर साधनाने पाणी देत आहे. रोवणी झालेल्या शेतांना तडे पडले आहेत.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र असून आतापर्यंत ७ हजार २७५ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरपैकी ४ हजार ४४० हेक्टरवर रोवणी झाली तर चंद्रपूर जिल्ह्यात ५ हजार ८९८ हेक्टर, गडचिरोली १३ हजार ८५१ आणि नागपूर जिल्ह्यात २२७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. पर्वू विदर्भात केवळ ४ टक्के रोवणी झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आपल्या शेतात टाकलेले पऱहे पिवळे पडत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास संपूर्ण भात पट्टा दुष्काळाच्या छायेत येण्याची भीती आहे. हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरत असून दररोज उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.बॉक्सनदी-नाले कोरडेचअपुºया पावसाने नदी-नाल्यांना अद्यापही पुर गेला नाही. भंडारा जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगेचे पात्र अद्यापही कोरडे आहे. इतर नद्यांचीही अशीच अवस्था आहे. सिंचन प्रकल्पही तळाला लागले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही कायम आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीटंचाई