शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:02 IST

मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

ठळक मुद्देउपोषणकर्त्याची प्रकृती खालावली : कोंढा येथे महिन्यातभरात दुसऱ्यांदा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे राजू शिंगाडे यांना दुसºयांदा कोंढा ग्रामपंचायतसमोर कुटुंबीयांसोबत आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती तिसºया दिवशी खालावली आहे.१३ आॅगस्टला ग्रामपंचायत कार्यालयासमोर राजु शिंगाडे आमरण उपोषणाला बसले आहेत. कोंढा येथे वडिलोपार्जित त्यांचे घर होते. ते मोडके असल्याने पडले. सध्या ते भाड्याने राहून मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने राजूला घरकुल मंजूर केले. मालकी हक्काच्या भूखंडवर घरकुल बांधण्यास सुरुवात केले. यासाठी रेती विटा आणले असता काहींनी रस्ता अडविला. घराला येण्याजाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पण हे दोन्ही रस्ते अडविले आहे. गैरअर्जदार महादेव शिंगाडे, गोपीनाथ टेंभुर्णे यांनी तर रस्त्यावर पक्के विटा, सिमेंटचे काम केले असल्याने येण्याजाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या संबंधात ग्रामपंचायत कोंढा, तहसीलदार, जिल्हाधिकारी भंडारा व पोलीस ठाणे अड्याळ यांना पत्र देऊन रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी केली. पण उपयोग झाला नाही. ग्राम पंचायत मोक्का समिती, तंटामुक्त ग्राम समिती यांनी मौक्यावर येऊन गैरअर्जदारांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिला. पण रस्ता मोकळा करुन देत नाही.यापुर्वी १२ जुलैला ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले होते. तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी १३ जुलैला मालकी भूखंडला येण्याजाण्यासाठी असणारे दोन्ही रस्ते भूमी अभिलेख कार्यालय, पवनी तर्फे मोजमाप करुन अतिक्रमण असल्यास ते हटवून देण्याचे आश्वासन दिले. घरकुलाचे बांधकाम करतांना रस्ता कोणी अडविल्यास तो अडथळा दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने पहिले उपोषण १३ जुलैला मागे घेतले होते. मात्र महिणा लोटला असतानाही ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी रस्ता मोकळा दिला नाही. उलट धमकी दिली जात आहे. याउलट रमाई घरकुल बांधकाम अजूनपर्यंत सुरु केले नाही म्हणून नोटीस पाठविली आहे. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम तीन दिवसाच्या आत न केल्यास घरकुल रद्द करण्यात येईल, असे पत्र सरपंच ग्रामपंचायतने दिले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे हितसंबंध अतिक्रमणात गुंतले असल्याची चर्चा आहे.ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी १४ जुलैला मोका चौकशी केली. त्यानंतर भूखंड क्रमांक ११५ ची मोजणी करुन रस्त्याचे अतिक्रमण निघाल्यास उपोषणकर्ते राजु शिंगाडे यांचा रहदारीचा रस्ता दोन्ही बाजूनी मोकळा करुन दिला जाईल. मात्र उपोषणकर्ते राजु शिंगाडेनी उपोषण सोडून घरकुलाचे बांधकाम सुरु करावे.डॉ. नुतन कुर्झेकरसरपंच, ग्रामंचायत, कोंढा

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणStrikeसंप