शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सततच्या भारनियमनामुळे पीकं संकटात; संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 15:19 IST

संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देसुकळीत उपोषण भारनियमन बंद करण्याची मागणी

साकोली (भंडारा) : अतिरिक्त भारनियमन बंद करून आठ तास शेतातील वीजपुरवठा नियमित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बारव्हा, जैतपूर, खोलमारा, तावशी, साखरा व चिकना येथील जवळपास २०० शेतकऱ्यांनी आमदारनाना पटोले यांच्या निवासस्थानी सुकळी येथे ठिय्या आंदोलन केले.

सहा दिवसांपासून अतिरिक्त भारनियमनाच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील अनेक गावांत एक तासही ओलीत पिकांना मिळत नसल्याने पीक उन्हाने वाळत चालले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदारनाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

महावितरण अधिकारी यांना संपर्क करीत आमदार पटोले यांचे स्वीय सहायक यांनी आंदोलनकर्त्यांसमोर अभियंता यांना फोन लावला, पण महावितरण अधिकारी जोपर्यंत येथे येऊन अखंडित आठ तास वीजपुरवठा लिखित देत नाही तोपर्यंत न उठण्याचा पवित्रा घेऊन येथे संतापजनक मुद्रेत होते. भारनियमाला त्रासून कृष्णा शालिक अतकरी यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहे काय, असा प्रश्न महावितरणला केला. ताबडतोब नियमित ८ तास वीजपुरवठा सुरू करा, अन्यथा गंभीर परिणामास महावितरण जबाबदार राहणार असा पवित्रा येथे सुरू आहे. यावेळी चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात गोपाल झोडे, पतिराम झोडे, निलकंठ चौधरी, रवी सोनवाने यांच्यासह जैतपूर, खोलमारा, तावशी, साखरा, बारव्हा व चिकना येथील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीMLAआमदारNana Patoleनाना पटोले