शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

चार महिने होऊनही उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:14 IST

Bhandara : मानस अॅग्रो साखर कारखाना देव्हाडा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (बु.) येथील मानस अॅग्रो साखर कारखान्याला ऊस पुरविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. उसाचा पुरवठाही कारखान्याला केला. त्यानुसार २०२४-२५ हंगामातील उसाचे गाळप झाले. मात्र, चार महिने होऊनही शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाले नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातील उसाचे चुकारे देण्यात आले. मात्र, जानेवारी महिन्यापासून उसाचे चुकारे न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसल्याने शेतीवर उचललेले कर्ज वेळेवर भरले गेले नसल्याने त्यांच्यावर व्याजासह रक्कम भरण्याची नामुष्की ओढवली आहे. उसाचे पीक वर्षभराचे आहे. त्यामुळे उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाल्यानंतरच बँकांचे कर्ज फेडावे लागते. मात्र, कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर चुकारे होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे चुकारे वेळेवर मिळतील, की पुन्हा वर्षभर कारखान्याच्या चकरा माराव्या लागतील, हे वेळच ठरवणार आहे. 

नगदी पिकाची लागवडवेळेवर उसाचे चुकारे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमी केली असून, नगदी मका पिकाची लागवड केली आहे.

"जानेवारी महिन्यात ऊस कारखान्याला नेण्यात आला. मात्र, चार महिने होऊनही उसाचे चुकारे मिळाले नसल्याने माझ्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने चुकारे लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी."- ओमेश्वर मुंगमोळे, शेतकरी

"डिसेंबर महिन्यातील उसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले. जानेवारीपासून देणे बाकी आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी आवश्यक होते, त्यांना देण्यात आले आहे. उर्वरित २४ ते २५ कोटी उसाचे चुकारे बाकी आहेत, ते लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे."- विजय राऊत, मानस कारखाना, देव्हाडा (बु)

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरीfarmingशेती