शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकरी सापडला द्विधा मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:01 IST

निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिसर्गाचा लहरीपणा : उन्हाळी धान कापणी, मळणीसह खरीप हंगामाची लगबग

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे. अड्याळ येथून महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या मार्गावरुन वाहनाची वर्दळ मंदावली आहे. याचाच फायदा आता शेतकरी धानपीक वाळविण्यासाठी करताना दिसत आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक व खरीप हंगामाच्या कात्रीत अडकला आहे. उन्हाळी पिकावर पाऊस कोसळल्याने धानपीक धोक्यात आले आहे. धान कापणीसाठी आधुनिक यंत्राच्या सहायाने कापणी करुन लगेचच मळणी देखील केली जात आहे. त्यानंतर धानपीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाळविलेले धानपीक केव्हाही भिजण्याची शक्यता आहे. त्यासाठी घाम गाळून शेतकरी पीक वाळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगाम आटोपताच खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. एकंदरीत हातचे पीक जावू नये यासाठी शेतकरी कुटुंबिय काटकसर करीत असले तरी हवामान खात्याच्या सतर्कतेच्या इशाºयाने निसर्गचा लहरीपणा शेतकºयाच्या पत्थ्यावर पडण्याची दाट भीती आहे.उन्हाळी धानाची कमी दरात विक्रीपवनी तालुका हा चौरास भाग म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. धानाची कापणी व मळणी अंतीम टप्प्यात आहे. धान विक्रीसाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेऊन पडक्या दरात धान विकत आहेत. पवनी तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी