शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

शेतकरी सापडला द्विधा मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:01 IST

निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिसर्गाचा लहरीपणा : उन्हाळी धान कापणी, मळणीसह खरीप हंगामाची लगबग

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे. अड्याळ येथून महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या मार्गावरुन वाहनाची वर्दळ मंदावली आहे. याचाच फायदा आता शेतकरी धानपीक वाळविण्यासाठी करताना दिसत आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक व खरीप हंगामाच्या कात्रीत अडकला आहे. उन्हाळी पिकावर पाऊस कोसळल्याने धानपीक धोक्यात आले आहे. धान कापणीसाठी आधुनिक यंत्राच्या सहायाने कापणी करुन लगेचच मळणी देखील केली जात आहे. त्यानंतर धानपीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाळविलेले धानपीक केव्हाही भिजण्याची शक्यता आहे. त्यासाठी घाम गाळून शेतकरी पीक वाळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगाम आटोपताच खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. एकंदरीत हातचे पीक जावू नये यासाठी शेतकरी कुटुंबिय काटकसर करीत असले तरी हवामान खात्याच्या सतर्कतेच्या इशाºयाने निसर्गचा लहरीपणा शेतकºयाच्या पत्थ्यावर पडण्याची दाट भीती आहे.उन्हाळी धानाची कमी दरात विक्रीपवनी तालुका हा चौरास भाग म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. धानाची कापणी व मळणी अंतीम टप्प्यात आहे. धान विक्रीसाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेऊन पडक्या दरात धान विकत आहेत. पवनी तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी