शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भंडारा शहरातील २८ तलाव व बोडींचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:08 IST

देशात तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात तब्बल २८ तलाव व बोडी अस्तित्वात आहेत. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देसंरक्षणाकडे दुर्लक्ष । तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी जिल्हा सुधार समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात तब्बल २८ तलाव व बोडी अस्तित्वात आहेत. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या तलावांची योग्य देखभाल दुरुस्ती केली नाही तर भंडारा शहरातील तलाव लुप्त होण्याची भीती आहे.भंडारा शहरात मोठ्या संख्येत असलेल्या या तलावांमुळे विहिरींना मुबलक पाणी होते. हिवाळ्यात विदेशी पक्षी तलावावर विहार करीत असायचे. त्यासोबतच तापमानावरही नियंत्रण राहायचे. या तलावांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने आता बोटावर मोजण्याइतके तलाव शिल्लक आहेत.शास्त्री नगर परिसरात नवतलाव हा २७ एकरात पसरलेला आहे. त्यावरुन एकेकाळी सिंचन होत होते. या तलावावर खासगी मालकी सांगून अवैध पद्धतीने कोरडे पाडण्यात आले. आता हा तलाव केवळ पाच एकराचा उरला आहे. या तलावात प्लॉट पाडून विकण्याचा घाट काहींनी घातला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि डॉ.माधवी खोडे यांच्या हस्तक्षेपाने हा प्रयत्न हाणून पाडला होता.मिस्कीन टँक हा १६.१ एकरात असून आता हा तलाव केवळ ६ एकर उरला आहे. २०१४ मध्ये ५०० ट्रॅक्टर भरण टाकून अवैध वस्ती विस्तारीत करण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात भंडारावासीयांनी आंदोलन केले. परिसरातील वस्तीचे घाण पाणी या तलावात सोडले जाते. या तलावाच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम या तलावाचे मोजमाप करण्याची गरज आहे.डॉ.व्यास हॉस्पीटल जवळ असलेली बोडी बुजविण्यात आली असून जकातदार शाळेजवळील जोगीतलाव, सहकार नगराजवळील बोडी, पोलीस ग्राउंडलगतचा तलाव सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तलावांचे अस्तित्व वाचविण्यासाठी आता भंडारा जिल्हा सुधार समितीने पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या निवेदनावर अध्यक्ष डॉ.नितीन तुरस्कर, विजय खंडेरा, प्रतीक तांबोळी, विकास मदनकर, शीतल तिवारी, अ‍ॅड.शिशीर वंजारी, अजय मेश्राम, शैलेश श्रीवास्तव, नितीन कुथे, विजय निचकवडे, संजय मते, मयूर बिसेन आदींच्या स्वाक्षºया आहेत.शहराचे वैभव खांब तलावमहानुभाव पंथाच्या पवित्र लीळाचरित्र ग्रंथात उल्लेख असलेला खांब तलाव शहराचे वैभव आहे. ९०० वर्षे प्राचीन या तलावाला चक्रधर स्वामींचा पदस्पर्श लाभला आहे. तलावाच्या काठावर विविध देवळे आहेत. त्यामुळे या परिसराला धार्मीक महत्व आहे. २००४ ते २००९ दरम्यान राष्ट्रीय समविकास योजनेअंतर्गत खांब तलावाचे चुकीच्या पद्धतीने सौंदर्यीकरण करण्याचा आरोप आहे. पाण्याचा येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. तलाव बंदीस्त झाला. या तलावाचा मुळ आकार कमी झाला. यानंतर वर्षभरापूर्वी एमटीडीसी तर्फे सुरु असलेल्या कामामध्ये तलावाचा आणखी आकार कमी झाला आहे. प्रवाह सुरु ठेवण्यासाठी छिद्रे ठेवण्याची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी