शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध

By admin | Updated: March 25, 2017 00:33 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे.

दर १० मिनिटांनी नोंदविली जाणार माहिती : सहा महिन्यांत सुरु होणार २०६५ पेक्षा जास्त केंद्र भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात २०६५ पेक्षाही जास्त ठिकाणी हवामान केंद्र सहा महिन्यात कार्यान्वित होणार आहेत. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढेल यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करुन हवामानविषयक माहिती ‘महावेध प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हवामान विषयक माहितीचा पिक विमा योजना व कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थानासह अन्य क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. (नगर प्रतिनिधी)हवामान विषयक माहिती मिळणार मोफत स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची महावेध प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यात सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली जाणार असून ७ वर्षाकरीता महावेध प्रकल्प स्वखर्चाने राबविण्यात येणार आहे. शासनास हवामान विषयक मोफत माहिती पुरविण्याची जबाबदारी या संस्थेची असणार आहे. सरकारी जागा उपलब्ध करणार सर्व महसूली मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीकरीता ५ मीटर बाय ७ मीटर जागा शासन उपलब्ध करुन देईल. सर्व महसूली मंडळामध्ये प्राधान्याने वनेत्तर शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येईल ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होणार नाही त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निमशासकीय संस्थांच्या जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळामध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय जागेचा ताबा घेण्याच्या कार्यवाहीचे कृषि आयुक्तांच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे नोडल अधिकारी राहणार आहेत.सहा महिन्यात केंद्राची उभारणी महावेध प्रकल्पांतर्गत सर्वसाधारण प्रदेशामध्ये १२ कि.मी. बाय १२ कि.मी. अंतरावर आणि डोंगराळ भागात ५ कि.मी. बाय ५ कि.मी. अंतरावर हवामान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. जागा हस्तांतरीत केल्यापासून सहा महिन्यात हवामान केंद्राची उभारणी पूर्ण करावयाची आहे. १० मिनिटांनी माहिती नोंदविली जाणारप्रत्येक स्वयंचलित हवामन केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकाची अद्ययावत वेळेच्या माहितीची दर १० मिनिटांनी डेटा लॉगरमध्ये नोंद घेतली जाणार आहे. ही माहिती दर एक तासांनी सर्व्हरला पाठविली जाईल. उपलब्ध होणारी हवामान विषयक माहितीचा शासन अर्थसहाय्यित पिक विमा योजनांकरीता अधिकृत हवामान विषयक माहिती म्हणून उपयोग करण्यात येईल. महावेध प्रकल्पांतर्गत शासनास दैनंदिन मोफत प्राप्त होणाऱ्या अद्ययावत वेळेच्या हवामान विषयक माहितीचा जनहितार्थ उपयोग करण्यात येईल. लहरी हवामानापासून कृषी क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी महावेध प्रकल्प हवामानाचा अचूक वेध घेऊन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्यास मदत होणार आहे.