शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शासन धोरणाविरुद्ध कर्मचारी रस्त्यावर

By admin | Updated: September 3, 2015 00:18 IST

कामगार कायद्यातील बदलांविरूध्द केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारला देशव्यापी संप पुकारला होता.

भंडारा : कामगार कायद्यातील बदलांविरूध्द केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारला देशव्यापी संप पुकारला होता. याला साद देत जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी होऊन रस्त्यावर उतरले. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी शुकशुकाट होता. संपात बँक, विमा कर्मचारी सहभागी झाल्याने एका दिवसांचा जिल्ह्यातील कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार ठप्प पडला. कामगार संघटनांच्या संपामुळे जवाहरनगर आयुध निर्माणी कारखान्यालाही फटका बसला.देशभरातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सुमारे १५ कोटी कामगार सदस्यांचा या संपात सहभाग होता. या संपाचे आयोजन दहा केंद्रीय कामगार संघटनांनी केले होते. संपात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. भंडारा शहरातील शास्त्री चौकात एकत्रित जमलेल्या कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गाने शक्तीप्रदर्शन करीत मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येतील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या संपात राज्य कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती, आरोग्य कर्मचारी संघटना, बँक, भारतीय जीवन विमा कर्मचारी संघटना, पोस्ट कार्यालय, बीएसएनएल, आयुध निर्माणी, अंगणवाडी सेविका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घरकामगार, कंत्राटी कामगार अशा विविध संघटनांनी यात सहभाग घेतला. शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा त्रिमूर्ती चौकात विसर्जित करण्यात आला. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केल्यात. यानंतर विविध संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर यांच्या माध्यमातून त्या सोडविण्याचे निर्देश दिले. शिष्टमंडळात वसंत लाखे, रामभाऊ येवले, जाधव साठवणे, एस. बी. भोयर, प्रभाकर कळंबे, सतिश मारबते, अतुल वर्मा, विलास खोब्रागडे आदींचा समावेश होता.संपकर्त्यांच्या प्रमुख मागण्याकेंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता लागू करावा, आगावू वेतनवाढ व महिला कर्मचाऱ्यांना शिफारस केलेली बाल संगोपन रजा मंजूर करावी, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, पाच दिवसांचा आठवडा, जूनी पेंशन योजना सर्वांना लागू करावी, रिक्त पदे तात्काळ भरावी, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, जात पडताडणी प्रकरणात अविलंब निर्णय घ्यावे आदीं मागण्यांचा समावेश आहे.आयटकची वेगळी चूलशासनाच्या कामगार, किसान, जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा आयटकनेही सहभाग घेतला. त्यांच्या समवेत असंघटीत कामगारांनी मोर्चात सहभाग घेतला. त्यांचा विशाल मोर्चा त्रिमूर्ती चौकात आल्यानंतर कर्मचारी संघटनेतील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. या संघटनेच्या मागण्या काही प्रमाणात सारख्या असल्या तरी दोघांचीही आमोरासामोर भाषणे सुरू झाल्याने उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. (शहर प्रतिनिधी)