शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

वांग्यांच्या ४० रुपये किलो दराने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 5:00 AM

श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे.

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न कमी झाले असून मागणी वाढल्याने वांग्याचे दर ४० रुपये किलो प्रतिदराने विकत आहेत. राजकीय भाषेत वांग्याला अच्छे दिन आल्याची चर्चा भाजी बाजारात होत आहे. श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे. गत दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाचे दिवस असल्याने वांगी पिकाला किडीचा त्रास अधिकच जाणवत आहे. किडीने चांगले वांग्याचा बाजारात पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे वांग्याला अच्छे दिन आलेले आहेत. शेतकऱ्याच्या वांगी कमी जरी निघत असला तरी भाव अर्थात दर चांगला असल्याने शेतकरीसुद्धा समाधानी दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्याची शेती सुधारलेली आहे. ठिबक मल्चिंगचा आधार घेत भाजीपाल्याची शेती केली जात आहे. अख्ख्या पावसातही जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पन्न सुमार आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले होते. मात्र आता भाजीपाल्याला अच्छे दिन आले असून सर्वात जास्त भाव वांग्याला मिळत आहे. प्रतिकिलो ४० रुपये दराने अगदी काही वेळातच व्यापारी वांग्याला मागणी मिळत आहे. बीटीबी सब्जी मंडी भंडारा येथे चवळी शेंग ३५रुपये किलो, वांगे ४० रुपये किलो, कारले ३० रुपये किलो, फुलकोबी २० रुपये किलो, टमाटर २२० रुपये कॅरेट, मिरची २० रुपये किलो, मेथी भाजी शंभर रुपये किलो, भेंडी २० रुपये किलो, दोडका/ तुरई २० रुपये किलो दर सुरू आहे.

वांगा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशक व्यतिरिक्त आणखी इतर उपाय शेतकऱ्यांना सुचविलेले आहेत. विषमुक्त अन्न उपक्रमांतर्गत कीडनाशकात काही पर्याय सुचविलेले आहेत. नैसर्गिकता काही प्रमाणात कीड नियंत्रण शक्य आहे. शेतकऱ्यांनी वांग्याच्या बागेत प्रयोग करून अभ्यास घ्यावा.-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनीभंडारा जिल्हा भाजीपाल्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. मात्र मागणीच्या तुलनेत वांग्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत वांग्याला सर्वाधिक भाव आहे. वांग्याच्या खालोखाल इतरही भाज्यांना बरा भाव आहे. शेतकऱ्यांनी बागेची नीट काळजी वेळेत घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा. -बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा. वांग्याच्या पिकाला किडीचासुद्धा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने कीडग्रस्त वांग्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे वांग्याचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यामुळे भाव चाळीस रुपयांच्या घरात आहे. -टिकाराम भुसारी, वांगा उत्पादक शेतकरी, पालांदूर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या