शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या बारीक कणांमुळे वाहनचालक त्रस्त

By admin | Updated: July 11, 2015 01:40 IST

पवनी तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. वैनगंगा नदी पात्रातील रेतीची विदर्भात मागणी असल्यामुळे ट्रक, टिप्परचा सहायाने दुरपर्यंत रेतीचा पुरवठा केला जात आहे.

पवनी/पालोरा : पवनी तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. वैनगंगा नदी पात्रातील रेतीची विदर्भात मागणी असल्यामुळे ट्रक, टिप्परचा सहायाने दुरपर्यंत रेतीचा पुरवठा केला जात आहे. ट्रक चालक रेतीघाटावरून रेती भरून आणतात; मात्र रेतीवर कोणत्याही प्रकारचे आवरण ताळपत्री टाकीत नसल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेतीचे कण वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपघात घडत आहेत.पवनी तालुक्यात इटगाव, कुर्झा, येनोळा, जुनोना, वलणी, शिमनाळा, गुडेगाव, पवनी आदी रेतीघाटाचा समावेश येतो. रेतीची वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाकडून काही नियम दिले आहेत. यात रेती क्षमतेपेक्षा जास्त भरू नये, रेती ट्रकमध्ये भरले असता त्यावर पांघरून घालणे अशा प्रकारे असे अनेक नियम बांधून दिले आहेत. मात्र ट्रक मालक प्रशासनाच्या आदेशाला घाब्यावर ठेवून स्वमर्जी करीत आहेत. दररोज शेकडो ट्रॅक, ट्रॅक्टर रेतीचा पुरवठा दररोज करतात. जे ट्रक शहरी भागात जातात अशा ट्रॅक्टर रेती उडू नये पांघरून घातले जाते. मात्र तालुक्यात किंवा जवळपास रेतीपुरवठा करणारे ट्रक, ट्रॅक्टर रेतीवर काहीही झाकत नाही. खुलेआम दिवसा ढवळ्या रेती पुरवठा केला जातो. रेतीवर काहीही झाकत नसल्यामुळे दुचाकी चालकांच्या डोळ्यात रेतीचे कण जातात. यामुळे बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना डोळयांचे आजार बळावले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहेत. रेतीचे ट्रक किंवा ट्रॅक्टर तपासणीचे काम महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करित नसल्याचे चित्र आहे. पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीस गस्तीवर असतात. या संदर्भात एक वाहतूक पोलिसासोबत संपर्क साधला असता त्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही कार्यवाही केली असता पुढाऱ्यांचा दबाव येतो. हप्ता कमी व्हायला नको, अशी तंबी दिली जाते. त्यामुळे रेती मालकांवर दंड वसूल न करता एंट्रीच्या नावाखाली रक्कम गोळा केली जाते. जनतेचे रक्षण करणारे अधिकारी जर भक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आहे. दर आठवड्याला दवाखान्यात अनेक रुग्ण रेतीचे बारीक कण डोळ्यात गेले म्हणून येतात. डोळ्यात बारीक कण गेल्यानंतर डोळ्यांना चोळतो त्यामुळे डोळ्यात मोठ्या जखमा होतात. डोळ्यात रेतीचे कण अथवा कोणतेही बारीक कण गेले असता त्याला चोळू नये, डोळे पाण्याणे स्वच्छ धुतल्यास बारीक कण बाहेर निघत असते, असे डॉ. अजय भालाधरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)