शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:46 IST

भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय मान्यता : सेतू निर्माण कृती समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु) : भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचे स्वप्न साकार होत असल्याने या परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कछ देना सीखे’ या समर्पित भावनेने सदर पुलाची गरज लक्षात घेवून ईटान कोलारी सेतु निर्माण कृति समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी या पुलाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेवून हे आव्हान स्विाकरले. त्यांनी कृती समितीमार्फत शासन, प्रशासन आणि भाजप संघटनेकडे दमदार पाठपुरावा केला. परिणामी या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली.सुमारे ४० वर्षापुर्वी किटाडी-विरली (बु) या जिल्हामार्गाचे बांधकाम करण्यात आले. त्याचवेळी भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाºया ईटान-कोलारी पुल बांधकामासाठी सर्वेक्षण झाले होते. कालांतराने हा प्रस्ताव मागे पडला. याच संधीचा गैरफायदा घेवून जिल्ह्यातील एका वजनदार लोकप्रतिनिधींनी हा पूल अन्यत्र हलविण्याचा डाव आखला. याविषयी परिसरात कुणकुण लागताच नि:स्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेल्या उध्दव कोरे यांनी याविरुध्द लढण्यासाठी कंबर कसली.सर्वप्रथम त्यांनी राजेश महावाडे या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांना हा पुल ईटान -कोलारी दरम्यानच होणे कसे सर्वांच्या सोयीचे आहे, हे पटवून दिले. या सर्व मान्यवरांची बैठक घेवून हा पुल अन्यत्र हलविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी ईटान - कोलारी सेतु निर्माण कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर पुलासाठी पाठपुरावा करुन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देण्याची ठरविण्यात आले. या समितीमध्ये अध्यक्ष वामन बेदरे, निमंत्रक अनिल मेंढे, संयोजक राजेंद्र फुलबांधे, संपर्क प्रमुख उध्दव कोरे, तर सदस्य म्हणून कृष्णाजी शहारे, प्रदिप बुराडे, संजय गजपुरे, वामन तलमले, चंदाबाई राऊत, दयावंती शिलार, अशोक प्रधान, डॉ. वासुदेव विधाते, मेघेश्याम वैद्य, शंकर हुमने, विश्वपाल हजारे, अशोक पारधी, गजानन ठाकरे आणि हरिशचंद्र भाजीपाले यांचा समावेश आहे.या समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी परिश्रम करुन ईटान-कोलारी आणि अन्य ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व इतर बारकाव्याचा अभ्यास करुन ईटान-कोलारी येथेच पूल उभारणे कसे सोयीचे आहे ? हे अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना पटवून दिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, तत्कालनी खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, आ. डॉ. परिणय फुके, आ. बाळा काशिवार, आ. बंटी भागडीया आणि अनेक मंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहार करुन व भेटी घेवून पाठपुरावा केला.लुप्त झालेल्या कार्यकर्ता संस्कृतीसाठी प्रेरणावाटसध्या विविध पक्षांमध्ये कार्यकर्ता संस्कृती लुप्त होत चालली असून कंत्राटदार संस्कृती उदयास येत आहे. अशा परिस्थितीत उध्दव कोरे यांच्यासारखा कार्यकर्त्याने नेटाने लढा देवून या परिसरातील जनतेसाठी वरदान ठरणाºया पुलाचा प्रश्न समितीच्या माध्यमातून मार्गी लावला. हे विविध पक्षातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.