शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

दुष्काळग्रस्त निधीतून जिल्हा बाद

By admin | Updated: February 19, 2016 00:58 IST

खरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून

इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराखरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद झाला आहे. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या जिल्ह्यातील ३७१ गावांतील शेतकरी मदतीविना राहणार आहेत. कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुल्तानी संकटाला बळी पडावे लागणार आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार, राज्याच्या विविध भागात एकूण १५ हजार ७४७ गावांमध्ये वर्ष २०१५ मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले होते. धानाची उतारीही कमी भरली होती. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात आली. यात दोन हजार कोटी रूपये बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या दृष्टीकोनातून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. या गावांमधील शेतकऱ्यांना शासकीय निर्देशानुसार काही दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र दोन हजार कोटी रूपयांच्या वाटपात नागपूर विभागांतर्गत फक्त दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपुर १ कोटी ५९ लक्ष व गडचिरोली १४ कोटी ३६ लक्ष जिल्ह्यांचा समावेश असून भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळण्यात आली आहेत.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी४खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अंतर्गत जिल्ह्याची पैसेवारी ५४ पैसे आहे. तालुकानिहाय अंतर्गत भंडारा तालुक्याची पैसेवारी ६२ पैसे, पवनी ६४ पैसे, तुमसर ६१ पैसे, मोहाडी ५२ पैसे, साकोली ४४ पैसे, लाखांदूर ४८ पैसे तर लाखनी तालुक्याची आणेवारी ४४ पैसे आहे. ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४७५ आहे.दुष्काळग्रस्त घोषित तालुकानिहाय गावांची संख्या४जिल्ह्यातील एकूण ८४६ गावांतर्गत खरीप पिकांची आणेवारी ३१ डिसेंबर २०१५ ला घोषित करण्यात आली. यात ३७१ दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १२, मोहाडी ७०, साकोली ९४, लाखांदूर ८९ तर लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.तांदळाच्या कोठारात राजकीय उदासिनता४पूर्व विदर्भात तांदळाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील बळीराजावर सातत्याने अस्मानी व सुल्तानी संकट येत आहे. सातही तालुक्यांमध्ये अंदाजाप्रमाणे धानाचे उत्पादन झाले नाही. निसर्गाच्या अवकृपेने उतारीत प्रचंड घट झाली. आणेवारीतही जुनी पद्धत अवलंबविल्याने बळीराजाच्या मानगुटीवर टांगती तलवार होती. जिल्ह्यातील ८४६ गावांपैकी फक्त ३७१ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित झाले. आणेवारीच्या फटक्यात जिथे जास्त नुकसान झाले, तिथे सरासरीत मापदंडात शेतकरी भरडला गेला. दुसरीकडे राजकीय उदासिनतेमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या निधीत भंडारा जिल्ह्याला स्पष्टपणे डावलण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आतातरी जागे होणार काय, असा सवाल आहे.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या यादीसह शासनाकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अजुनपर्यंत निर्णय प्राप्त झालेला नाही. याकडे पाठपुरावा सुरु आहे. -डॉ. सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.