शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना मोफत अन्नधान्यांचे वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : 'लोकमत' ई- पेपर आवृत्तीतून होत असलेल्या जनजागृतीचे कौतुक

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा): संपूर्ण जग भयभीत झालेल्या कोरोनावर उपाययोजनेसाठी आमदार निधीचा उपयोग तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात करणार आहे. विविध उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच लेखी पत्र दिले जाईल. याशिवाय स्वखर्चातून क्षेत्रातील अत्यंत गरीब परिवारांना तांदूळ, गहू, तेल व कडधान्यांचे वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणा आमदार राजू कारेमोरे यांनी पालोरा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका बैठकीत केली.
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या. अडचणींवर मंथन करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पालोरा येथील आठवडी बाजाराला भेट देत व्यावसायिक व ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या. सर्वांनी सामाजिक अंतर ठेवून तसेच पाणी व साबणाने हात घेऊन कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा दिला. यावेळी लोकमत ई- पेपर आवृत्तीचे वाचन करून 'लोकमत'ने घेतलेल्या लोक जागृतीच्या संकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
बैठकीला आमदार राजू कारेमोरे, सरपंच महादेव बुरडे, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, ठाणेदार निलेश वाजे, अमरकंठ लांडगे, सुखदेव मुरकुटे, प्रकाश भोयर, धान खरेदी केंद्राचे ग्रेडर रहांगडाले, डॉ. अभय शेंडे, ग्रामपंचायत सदस्य रोशन कडव, भोजराम तिजारे, मनीषा बुरडे, रवींद्र ठवकर, भैया कनोजकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजू कारेमोरे म्हणाले, सध्या कोरोनावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे काळजी घेणे, शासन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. संचार बंदीच्या काळात कोणत्याही सुविधाविणा नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणांपासून नागरिक रस्त्याने पायी गावांकडे परत जातांना दिसत आहेत. त्यांनी सावधानता बाळगून सर्वांना मदतीचे आवाहन केले. त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून स्वत: होम क्वारटाईनमध्ये रहावे. कोरोनाचा प्रसार बघता गाफील राहून चालणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक