शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

भंडारा शहरासह जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना संसर्गामुळे दरवर्षीसारखी आरास आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी नसली तरी भक्तांनी ...

भंडारा शहरासह जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना संसर्गामुळे दरवर्षीसारखी आरास आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी नसली तरी भक्तांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली होती. या दहा दिवसात कोरोना नियमांचे पालन करीत विविध धार्मिक उत्सवही पार पडले. जिल्ह्यात कुठेही गणेशोत्सवाला गालबोट लागले नाही. आता बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. रविवारी गणेश विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्थानिक नगरपरिषदांनाही जय्यत तयारी केली आहे.

भंडारा नगरपरिषदेच्यावतीने ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम टँक तयार करण्यात आले आहे. यासोबतच मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, पिंगलाई मंदिर त्याचप्रमाणे वैनगंगा नदीघाटावरही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तसेच शहरात दोन ठिकाणी कृत्रिम तलावही निर्माण करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी वैनगंगा नदी परिसरात लाकडी कठडे लावण्यात आले आहे. तसेच तेथे निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहे. यासोबतच नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सफाई विभागातील अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही तैनात केले आहे. यासोबतच जिल्ह्यातही ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. विनामास्क आढळल्यास नगरपरिषदेच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.

बॉक्स

वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

संजय सरोवराचे पाणी सोडल्याने भंडारा शहरातील कारधा पुलाजवळ वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन करताना कोणीही खोल पाण्यात जाऊ नये, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांची पालन करावे, प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.

बॉक्स

खोल पाण्यात जाणे टाळा

रविवारी बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले आदींची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी, मूर्ती खोल पाण्यात विसर्जन करण्याचा आग्रह करू नये.

बॉक्स

शक्य तो घरीच करा विसर्जन

कोरोना संसर्ग आणि जलाशयाच्या पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ते शक्य नसेल तर कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करावे.

कोट

जिल्ह्यात दहा दिवस गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडला. विसर्जनाच्या दिवशीही नागरिकांनी नियमांचे पालन करावे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे. नियमांचे पालन करावे.

-संदीप कदम, जिल्हाधिकारी